Home बुलढाणा ओला दुष्काळ’ जाहीर करुन,शेतकऱ्यांना आर्थीक मदत करा ; वसंतराव वानखेडे वंचित बहुजन...

ओला दुष्काळ’ जाहीर करुन,शेतकऱ्यांना आर्थीक मदत करा ; वसंतराव वानखेडे वंचित बहुजन आघाडी

288
0

 

मेहकर.आॅगस्टपासुन सुरु असलेल्या पावसामुळे होत्याचे नव्हते केले आहे.पोटच्या पोराप्रमाणे शेतकऱ्यांनी पिकांची जोपसना केली; परंतु अवकाळी पावसाने पिकासह साऱ्या स्वप्नांवर पाणी फिरविले आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी राजाला आर्थीक नुकसान भरपाई द्यावी,व विजबिल माफ करावे या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी मेहकर यांना वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंतराव वानखेडे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या कडे केली आहे.
ऐन दिवाळीत बरसलेल्या अवकाळी शेतातील कापूस, सोयाबीन, धान, ज्वारीसारखे पीक हातातून गेले.जिल्हातील शेतकरी परत संकटात आला. पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पिकांना कोंबदेखील फुटले आहेत. अतिवृष्टीमुळे कापसाच्या झाडाचे खराटे झाले. शेतीसाठी लागलेला खर्चही शेतक-याला निघाला नाही़ त्यामुळे शेतकरी राजा हा मोठ्या संकटात सापडला असून तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा,व विजबिल माफ करावे यासाठी
वंचित बहुजन आघाडीचे
उपविभागीय अधिकारी यांना निवेदनात नमुद केले की
गेल्या अनेक वर्षांपासून सतत नापिकी यावर्षी करोनामारीच्या पार्श्वभूमीवर मुळे शेतकरी हात लागून मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे आणि त्यातच निसर्गाच्या अवकृपेने नुकताच हातातोंडाशी असलेला घास हिरव्या गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे त्यामुळे शेतकऱ्याचा जीवन-मरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने त्याच्यापुढे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरला नाही
या संपूर्ण परिस्थितीचा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून शेतकऱ्यांना मदतीचा हात देत सरसगट हेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी व तसेच विज बिल माफ करीत धीर देण्याचे काम करावे अन्यथा देशाच्या पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांचा न्याय हक्काच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी मेहकर लोणार च्या वतीने तीव्र स्वरूपाचे आक्रोश आंदोलन छेडण्यात येईल याची शासनाने नोंद घ्यावी असे निवेदन वंचित बहुजन आघाडी च्या मार्फत देण्यात आले आहे
त्यावेळेस संघपाल पनाड, वसंतराव वानखेडे, डॉ राहुल दाभाडे, सिद्धार्थ अमोल, बाळासाहेब चव्हाण,संदीप थोरात, दत्ता राठोड,राहुल अवसरमोल,शालिक्रम मोरे, संदीप मोरे,गणेश नागरिक,विजय माने, गौतम सरकटे,अमित काकडे, सुनील मोरे,जिवन जाधव प्रभाकर इंगळे, समाधान मोरे, संतोष साळवे,आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

Previous articleसेन्ट्रल बँक शाखाधिकारी श्री धीरज पाटील यांना गावकऱ्यांनी दिला निरोप समारंभ
Next articleग्राम मालठाणा येथील विवाहिता बेपत्ता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here