कापूस पिकाचे पंचनामे करून हेक्टरी तीस हजार रुपये मदत देण्यात यावी.= सत्याग्रह शेतकरी संघटना

 

 

खामगाव=सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या कपाशीला चांगल्या प्रमाणात बोंडे लागले होते परंतु कालांतराने त्याचं रूपांतरण बोंड अळी मध्ये झाल्याने शेतकरी फार चिंतित पडलेला आहे व एकरी दहा क्विंटल येणारे उत्पन्न दोन वर आले एवढी दयनीय अवस्था शेतकऱ्याची झाली आहे तरी शासनाने शेतकऱ्याला दिलासा द्यायचा असेल तर हेक्टरी 30 हजार रुपये मदत व विमा कंपनीने 100% विमा जाहीर केला पाहिजे शेगाव खामगाव तालुक्यात कापसाचे उत्पन्न फार मोठ्या प्रमाणात घेतले जाते परंतु गुलाबी बोंड अळी ने कहर माजवला व शेतकऱ्याचं कापसावरील उत्पन्न फार मोठ्या प्रमाणात घटलं आहे मागील दोन वर्षात कमी जास्त पाऊस झाला यावर्षी कोरोना व गुलाबी बोंड अळी चे संकट यावर्षी जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी केली सुरूवातीपासून पाऊस सुरळीत येत होता त्यामुळे कापूस सोयाबीन पीक उत्तम राहील अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती मात्र परतीच्या पावसाने हाहाकार माजवला व हातातोंडाशी आलेलं सोयाबीन शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर सडून व वाहून गेलं तरीही शेतकऱ्यांनी लावलेला पैसा निघणे कठीण झाले आहे तर आता शेतकऱ्यांचे अतिभरवशाची पी क म्हणजे कापूस पीक पहिल्या वेचणी तच उलंगवाडी झाली व काही शेतकऱ्यांनी आता कपाशी उपटायला सुरुवात केली एवढा हताश शेतकरी या गुलाबी बोंड अळी मुळे झाला आहे तरीही कापूस पिकावर आलेल्या बोंड अळीचे पंचनामे करून हेक्टरी 30 हजार रुपये मदत देण्यात यावी अशी मागणी सत्याग्रह शेतकरी संघटना युवा आघाडी शेख आया ज गणेश सडत कार अनिल गव्हांदे संजय फाटे देवीदास फाटे शुभम पहुरकर शेख रब्बानी शिव शंकर वाशिम कार आदी कार्यकर्त्यांनी केली

Leave a Comment