श्री क्षेत्र देहूगाव नगरपंचायत कर्मचार्‍यांचा सावळा गोंधळ

 

पाणी पुरवठा न करता नागरिकांना धरले वेठीस

संत तुकाराम सोसायटी, नवीन बायपास रोड, वडाचामाळ, श्री क्षेत्र देहुगाव येथे नवीन नळ जोडणी करुन देखील नागरिकांना गेले ७ ते ८ दिवस पिण्यासाठी पाण्याचा थेंबही नाही.
विचारणा केली असता प्रत्येक वेळी, वेगवेगळी कारणे सांगून उडवा उडवीची उत्तर दिली जातात. सकाळी विचाल असता दुपारी पाणी येईल, दुपारी विचारले असता पहाटे पाणी येईल अशी उत्तरे दिली जातात. सर्व नियम व अटींचे पालन करून नवीन नळ जोडणी कनेक्शन घेतले असता अजून पर्यंत एवढे दिवस नागरिकांना पाणी पुरवठा केला जात नाही. आजुबाजुच्या भागात पाणी पुरवठा केला जातो परंतु संत तुकाराम सोसायटी मध्ये आज तागायत पाणी पुरवठा झालेला नाही.
कोणाच्या सांगण्या वरून अशी अडवणूक केली जाते किंवा अडवणूकीचे कारण काय नगरपंचायत पाणी पुरवठा विभागाचेे कर्मचारी हे काही उत्तर देत नाही.
या भागात गेले ६ ते ७ वर्ष स्थानिक प्रशासना कडुन कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा दिल्या गेल्या नाहीत. पिण्याचे पाणी, ड्रेनेज लाईन, पक्का रस्ता ना रस्त्यावरील दिवे. कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही.
२०२१ पर्यंत पुर्ण कर भरून देखील या भागातील नागरिक सर्व सुविधांपासून वंचित आहेत.

Leave a Comment