अर्जुन कराळे शेगाव
लासुरा फाट्यावर स्थित असलेल्या शांती आश्रम येथील संत विनायक महाराज यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले विनायक महाराज हे मूळचे संग्रामपूर तालुक्यातील उकळगाव मनाळीचे या गावचे रहिवासी आहेत महाराजांनी त्यांच्या जीवनात भरपूर सामाजिक व धार्मिक कार्यक्रम केले बरेचशा गावामध्ये मंदिराचे निर्माण केले आणि काही वर्षा पासून लासुरा फाटा येथील शांती आश्रमा मध्ये राहत होते
महाराजांच्या निधनामुळे त्यांच्या भक्तांमध्ये शोककळा पसरली आहे
आज दुपारी शांती आश्रमाच्या प्रांगणात त्यांचा देह विसर्जनाचा कार्यक्रम ठेवला आहे