अवकाळी पाऊसामुळे शेतकरी हावलदिल.पिके झाली जमीन जमिनदोस्त

0
397

 

 

सिल्लोड प्रतिनिधी :- आयुषी कुलकर्णी

आसडी रहिमाबाद सह परिसरात शनिवार झालेल्या वादळी पावसाने मक्का पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याबाबत कृषी विभागाने तात्काळ पाहणी करून पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
परिसरावर शनिवारी झालेल्या वादळी पावसाने मक्का पिके होतेच नव्हते करून सोडल्याने शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. शनिवारी रात्री 11:00 वाजता सुरू झालेल्या वादळी वार्‍या सह 1 तास चाललेल्या पावसाने मका, कपाशी,मिरची पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.मक्का व मिरची उंची मोठी असल्याने पाऊस व वार्‍या मुळे आडव्या झाला असल्याने आत्ता हे पीक हात चे गेल्या मुळे पुढे काय असा प्रश्न उभा राहिला आहे.परिसरात नगदी पीक म्हणून मक्का पिका कडे पाहिले जात असल्याने गेल्या ४ वर्षापासून मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
कोरोना पार्श्वभूमीवर आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजा ला आत्ता नैसर्गिक संकटाने ही आपल्या विळख्यात घेतल्याने दुष्काळात १३
वा महिना म्हणी प्रमाणे झाले आहे. लागवड केलेल्या क्षेत्रापैकी साधारण ४० ते ५० टक्के क्षेत्र पावसाने वार्‍याने बाधित केले आहे पिकांचे ही नुकसान झाल्याने मक्का व मिरची ही पिके उत्पन्न न देता खर्चात भर टाकून जाणारी ठरणारी आहे.
शनिवार रात्री झालेल्या वादळी पावसाने मका व बाजरी पिकांची पुरती वाट लावली आहे लागवड केलेल्या क्षेत्रापैकी ५० ते ६० टक्के क्षेत्र बाधित झाल्याने या पिकावर झालेला खर्च ही वसूल होईल की नाही असा प्रश्न पडला असल्याने वार्षिक गणित कसे जुळेल ही मोठी समस्या होऊन बसली आहे तरी शासनाने याकडे लक्ष केंद्रित करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here