आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी शेगाव पालिकेतील राज्यकर्त्यांना चांगल्या कामाचे प्रशस्तीपत्र दिल्याबद्दल आश्चर्य

0
691

 

शेगांव//शेगाव नगरपालिकेवर गेल्या पाच वर्षापासून भारतीय जनता पक्षाची सत्ता असून या पाच वर्षाच्या कार्यकाळात येथील राज्यकर्त्यांनी विकासाचे समाधानकारक काम केल्याबद्दल ते गौरवास पात्र ठरतात अशी मल्लीनाथी करीत आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी या राज्यकर्त्यांची पाठ थोपटली आहे. यामुळे आमदार डॉक्टर कुटे यांच्या या वक्तव्याबद्दल आश्चर्य वाटते. आमदारांच्या या पाठबळामुळे पालिकेतील भ्रष्टाचार जनतेला दिसणार नाही काय असा प्रश्न आम्ही जनतेच्या वतीने आमदार डॉक्टर संजय कुटे यांना विचारत आहो. गेल्या पाच वर्षात पालिकेत राज्य करताना राज्यकर्त्यांनी सर्वत्र भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजवलेली आहे .प्रत्येक कामात स्वारस्य राखण्याच्या वृत्तीमुळे कामाची गुणवत्ता लोप पावली आहे ज्या ठिकाणी विकास गरजेचा आहे त्या अनेक वस्त्यांमध्ये आवश्यक गरजा व सोयी सवलती उपलब्ध नसताना फक्त स्वकियांच्या ले-आउट मध्येच पालिकेच्या निधीतून राज्य व केंद्र शासनाच्या निधीतून विकासाची गंगा पोहोचवण्याचे काम या राज्यकर्त्यांनी केलेले आहे. त्यामुळे पालिकेच्या निधीचा उपयोग फक्त स्वतःच्या मालकीची संपत्ती विकसित करण्यासाठी झाला असल्याने त्याबाबतही आमदार कुटे काही बोलले असते तर याबाबत जनता समाधानी झाली असती नेत्यांनी कार्यकर्त्यांचे गुणगान करायला कुणाचीच हरकत नसून जनतेच्या मनात काय आहे हे ओळखण्याची नितांत आवश्यकता आहे. यामुळे आमदार कुटे यांनी गेल्या पाच वर्षात झालेल्या कामांबाबत सखोल चौकशी करून त्यात किती प्रमाणात भ्रष्टाचार झाला याचाही तपास करायला हवा स्वच्छतेचे पारितोषिक मिळण्याचे डोंगारे पिटणारे राज्यकर्ते गावात किती घाण आहे हे फिरून बघितले तर सत्य परिस्थिती समोर येईल. विकासाच्या कामासाठी अनेक नगरसेवकांनी स्वतःच्या नातलगांच्या नावाने शहरात विविध ठिकाणी कमानी उभारल्या नगरपालिकेचा पैसा आणि स्वतःच्या नातलगांच्या उद्धार करायचा हा एक भाग एकीकडे, तर महापुरुषांच्या नावाने असलेल्या कमानींचे काम रखडले आहे तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नावे सार्वजनिक वचनालया ला ६०-७० लाखाचा निधी देऊ अशी घोषणा हवेतच विरली गेल्या तीन वर्षांपासून ही कामे प्रलंबित आहेत यालाच विकास म्हणायचे काय? निषेध म्हणुन नगराध्यक्षांचा पुतळा जाळल्याने प्रहारने अगतिकता केल्याचा मुद्दा पटविण्याचा प्रयत्न सुरू असून आधी आंदोलन का झाले याचाही खोलात विचार करण्याची गरज आहे. हिंदुत्वाचा ठेका घेतलेल्या पक्षाने हिंदूंच्याच भावना दुखावल्या. त्याचा जाब जंटमार्फत विचारण्याची वेळ आलेली आहे.हम करे सो कायदा अश्या अभिरभावत न प सत्ताधीकरी वागत आहेत.मांजर दूध पिते डोळे मिटून त्यामुळे तिला कोणी बघत नाही असे तिला वाटत होते परंतु राज्यकर्त्यांनी जे काही केले ते सगळे जनतेला माहीत असून वेळ आल्यानंतर जनताच त्यांना याचे उत्तर देईल हे न प सत्ताधार्यांनी लक्षात ठेवावे. प्रहारने नगराध्यक्षांचा पुतळा जाळला त्यावेळी तळफळाट करीत भाजपच्या महिला संघटनांद्वारे आरडाओरड करण्यात आली परंतु भाजपाचेच राज्यस्तरीय नेते असलेले प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व महीला कार्यकर्त्यांबद्दल जे उद्गार काढले त्यासाठी भाजपच्या महिला आघाडीने आंदोलन केले असते तर ते महिलांना समजू शकले असते. झोपेचे सोंग घेतलेल्या राज्यकर्त्यांना जागे करण्यासाठी प्रहार जवळ आंदोलनाशिवाय पर्याय नसून आतापर्यंत प्रहारने विविध आंदोलने करूनही राज्यकर्त्यांची कुंभकर्णी झोप अद्याप उघडलेली नाही.यामुळे आता मतदानाच्या माध्यमातून जनताच सत्तेच्या मस्तीत बेफाम झालेल्या सत्ताधारी मंडळीला वेसण घालनार व सत्तेच्या मस्तीत असणाऱ्या हत्तीरूपी न प सत्ताधारी यांच्यावर प्रहार संघटना अंकुश ठेवण्यासाठी जनहिताचे आदोलन करून जनतेचं मन जिंकण्याचे काम आगामी काळात प्रहारच्या माध्यमातून करू हे भाजपाच्या राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here