नांदुरा (प्रफुल्ल बिचारे पाटिल):-
खरीप हंगाम 2020 मध्ये ईगल सीड्स , बायोटेक लिमिटेड या कंपनीचे सोयाबीन नांदुरा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी केंद्रांमधून खरेदी करून पेरले होते परंतु 2020 मध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी या कंपनीचे बियाणे घेऊन पेरले परंतु ते उगवलेच नाही, अशा नांदुरा तालुक्यातील 132 शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी नांदुरा शिवसेनेच्यावतीने आवश्यक त्या पुराव्यानिशी केल्या होत्या. त्यापैकी फक्त 13 शेतकऱ्यांनाच मदत मिळाली. कृषी विभागाच्या वतीने ना स्थानिक कृषी केंद्र यांनी उर्वरित शेतकऱ्यांना कुठलीही मदत केली ना इंदूरच्या कंपनीने. एक वर्षापासून नांदुरा तालुक्यातला शेतकरी आशेने मदतीची वाट पाहत आहे. परंतु अजूनही नुकसान भरपाई झाली नाही. त्यामुळे आज नांदुरा तहसील या ईगल कंपनीचे सोयाबीन आपल्या तालुक्यात कृषी विषयक दुकानदारांनी ईगल सीड्स बायोटेक कंपनी चे सोयाबीन 2021 मध्ये विकू नये,आणि विकल्यास जर सोयाबीन निघाले नाही तर त्याची पूर्ण जबाबदारी स्थानिक दुकानदारांना घ्यावीच लागेल, अशा प्रकारचे निवेदन नांदुरा तहसील ला शिवसेनेने शिवसेना नांदुरा तालुका वतीने देण्यात आले यावेळी तालुकाप्रमुख संतोषभाऊ डिवरे, राजू काटे, सुनील जूनारे, रवी ईटखेडे, गजानन करांगळे, संजयसिंह जाधव, राम पांडव, गणेश ताठे, दत्ता जुमळे, नंदू खोदले, दीपक जुमडे, जगदीश चोपडे, विशाल फलके, संतोष लाहुडकर, संतोष दिघे, मनोज पाटील, एकनाथ वक्ते, ईश्वर पांडव, बाळकृष्ण गायगोळ, पद्माकर लांडे, महादेव काळे, भिका गायकवाड, विष्णू श्रिरसागर, विशाल हेलगे, विष्णू शिरसागर, मिलिंद हिवराळे, पुरुषोत्तम महाले आदी शिवसैनिक उपस्थित होते.