हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी
प्रहार उपतालुकाप्रमुख अरुण शेवाणे यांच्या प्रयत्नाला यश.
कीटकनाशक तपासणी शास्त्रज्ञ समिती अहवाल निष्कर्षावरून औषध विक्रेता व कंपनीवर फौजदारी होणार.
कापूसतळणी येथील शेतकरी मधुकर देविदास काळे यांचे सराय मौजे मधील आठ एकर शेतात दि.१७ जूनला पेरणी केलेलं सोयाबीन पिक विक्रमी उत्पन्न असलेल्या फुलोल्या स्थितीत कापुसतळणी येथील सागर ॲग्रो सर्विस या कीटकनाशक दुकान दाराच्या सल्याने पिकांवर फवारणी केली. सात – आठ दिवसानंतर पिकाची पाहणी केली असता संपूर्ण फुलाची गळ झाल्याचे दिसून आले. ही बाब कीटकनाशक विक्रेता लक्ष्मीकांत राठी यांना सांगितले. परंतु श्री राठी यांनी सदर बाबीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून आठ दिवस वेळ मारली. खरंतर औषध विक्रेता यांनी सदर औषध कंपनीला माहिती देऊन सदर शेताची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देऊन उपाययोजना करणे अपेक्षित होते. परंतु औषध विक्रेत्यांनी तसे केले नाही म्हणून शेतकऱ्यांनी ही बाब परिसरातील शेतकऱ्यांना सांगितले असता ४०-५० शेतकऱ्यांनी गावातील शेतकऱ्यांचा कैवारी प्रहार संघटना उपतालुकाप्रमुख अरुण शेवाणे यांची भेट घेतली व श्री शेवाणे यांनी क्षणाचाही विलंब न करता सदर शेतात जाऊन पिकाची पाहणी केली आणि लगेच तालुका कृषी अधिकारी यांना दि.२७/८/२०२१ ला निवेदन दिले आणि दि. ३/९/२०२१ पर्यंत सदर पिकाची पाहणी शास्त्रज्ञां करून दोषींवर कारवाई करणे तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी हेक्टरी 30 क्विंटल भरपाई मिळावी अन्यथा दि.३/९/२०२१ ला सदर शेतात अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता त्या अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी यांनी दिनांक २/९/२०२१ ला समिती गठित करण्यात आली या समितीमध्ये डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथील कीटकनाशक शास्त्रज्ञ कु. सोनल नागे, सदस्य तसेच एम .जी .कोरे (ता.कृ.अ.) सदस्य, ए.बी .राठोड (कृ.अ.प.स.) सदस्य सचिव, जी. आर. मोरे (कृ.अ.) एम .एम. जाधव(कृ.स.), तक्रार कर्ता अरुण शेवाणे, औषध विक्रेता लक्ष्मिकांत राठी , आदामा कंपनीचे प्रतिनिधी प्रशांत मोरे,पंच संजय हिंगे, प्रशांत सरदार, गजानन हरणे, शेतकरी सत्यम काळे आदींच्या समक्ष पाहणी झाली. समितीचा निष्कर्ष असा की, क्लोरोपायरीफॉस+सायपरमेथ्रीन हे औषध सोयाबीन पिकासाठी शिफारशीत नसल्यामुळे सोयाबीन पिकाचा संपूर्ण फुलोऱ्याची गळ झाली आणि भविष्यात उत्पन्न होऊ शकणार नाही अशाप्रकारे औषध विक्रेता दोषी असल्याचे सिद्ध झाले. म्हणून औषध विक्रेता व कंपनी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे व शेतकऱ्यांना हे. 30 क्विंटल ची मदत मिळावी अशी मागणी तक्रार कर्ते अरुण शेवाणे व शेतकऱ्यांनी केली आहे.