सिंदखेड राजा (सचिन खंडारे )
कोरोना हा झपाट्याने वाढत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जो तो आपल्या परिवाराची आपल्या स्वतःची काळजी घेताना दिसत आहे ‘ते चांगले लक्षण आहे ! …
मनुष्याच्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण असतो तो विवाह ‘
मागील वर्षीसुद्धा कोरोना चा प्रादुर्भाव होता व या वर्षी सुद्धा कोरोना चा प्रादुर्भाव मागील वेळेपेक्षा जास्त आहे . :
ज्या वधू-वराची या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये लग्न ठरलेली आहेत त्या सर्वांची लग्न वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही नि रदद सुद्धा केलेली आहेत ‘
तर काहींनी फक्त चार ते पाच जणांची उपस्थिती मध्ये आपला विवाह उरकला ‘
एप्रिल-मे हे उन्हाळ्याचे दिवस असल्याकारणाने वयात आलेल्या तरुण तरुणी चे लग्न ठरवले जाते ‘
मग लग्न ठरवायचे असल्यास मुलांना बघण्याचा कार्यक्रम मुलींना बघण्याचा कार्यक्रम ठरलेला असतो ‘
काहींना तर जिल्ह्याच्या बाहेरील वधू आणावी लागतील ‘
त्यामुळे त्यांची सध्या जाण्याची येण्याची पंचाईतच झाली आहे ‘
तर काही वर पक्षाकडील मंडळी वधू बघण्यासाठी घराबाहेर पडू शकत नाही ‘
कडक लॉकडाऊन असल्याकारणाने व पोलिसांचा प्रसाद मिळत असल्या कारणाने घरातच राहणे बरे अशी भूमिका वर पक्षाकडील काही मंडळींनी घेतली दिसते !
तर या वर्षी लग्न झाले नाही तरी चालेल परंतु कोरोचा नायनाट व्हायला हवा अशी भूमिका काही भावी नवरदेव यांनी व्यक्त केलेली आहे . !
।लग्न यावर्षी नाही झाली तरी चालेल परंतु कोरोना चा प्रादुर्भाव बघता कोरोनाचा नायनाट होणे गरजेचे आहे ‘
कडुबा खंडारे ! भावी नवरदेव :
..लग्न हा माणसाच्या जीवनातील महत्त्वाचा घटक आहे परंतु सध्या परिस्थिती गंभीर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मुलगी बघण्यापेक्षा स्वतःची व परिवाराची काळजी घेणे हिताचे आहे … अमोल खिल्लारे .
…त्यामुळे आधी लगीन कोंढाण्याचे या म्हणीप्रमाणे अगोदर कोरोणा चा नायनाट व्हावा हीच अपेक्षा भावी नवरदेव यांनी व्यक्त केली आहे !
….