सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट:-सद्या कोरोना या रोगाने रौद्र रूप धारण केले आहे.दररोज कोरोना रुग्ण संख्येत झपाट्यानी वाढ होत असून मृतांच्या संख्येने देखील उच्चांक गाठला आहे.अश्या परिस्थिती मध्ये रुग्णालयात खाट उपलब्ध नसून ऑक्सिजन तसेच औषधांचा देखील मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे.वर्धा जिल्ह्यात मोठ्या संख्येने कामगार तसेच मोलमजुरी करणारे लोक आहेत.गोरगरीब सामान्य नागरिक शासकीय रुग्णालयात खाटा नसल्याने खाजगी रुग्णालयात रुग्णांना दाखल करण्यास नेत असतात मात्र काहींची आर्थिक परिस्थिती एकदम हलाखीची असल्याने ते खासगी रुग्णालयात उपचार घेऊ शकत नाही त्यामुळे पैश्या अभावी देखील निष्पाप लोकांचा या रोगामुळे बळी जात आहे या परिस्थितीत जिल्ह्यातील संपूर्ण खाजगी कोविड रुग्णालय यांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट करावे.या योजने मध्ये रुपये दिड लाख पर्यंत आर्थिक सहाय्य राज्य सरकार तर्फे देण्यात येते यामध्ये कोविड या रोगाचा समावेश आहे या योजनेअंतर्गत आर्थिक मदत जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला करून द्यावी जणे करून पैश्या अभावी कोणताही रुग्ण दगावणार नाही व औषधांचा व इतर बाबींचा काळाबाजार करणाऱ्यांकडून गोरगरीब जनतेची आर्थिक लूट देखील होणार नाही त्यामुळे तत्काळ या योजनेत जिल्ह्यातील सर्व खाजगी कोविड रुग्णालयाला सामाविष्ट करा अशी मागणी जय जवान जय किसान संघटनेचे वर्धा जिल्हा उपाध्यक्ष आकाश बोरीकर यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.