अमरावती:-भारतात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवल्याने मृत्युचे प्रमाणदेखील वाढलेले असल्याने अनेकांना उपचाराअभावी मृत्यू होत आहेत . केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने दि .२६ / ०४ / २०२१ रोजी काढलेल्या आदेशान्वये दिव्यांगांना प्राधान्याने तपासणी उपचार व लसीकरण करण्यात यावे असे आदेश असतांना देखील अमरावती जिल्ह्यातील संव्यांग व्यक्तींना लस मिळत नसल्याने दिव्यांगांना लसीकरणसाठी वणवण उन्हात भटकावे लागत आहे.
सामान्य व्यक्तींच्या तुलनेत दिव्यांग व्यक्तींची रोग प्रतिकारक शक्ती कमी असल्याने त्यांना संसर्ग जलद गतीने होऊ शकतो असे असतांना देखील सर्व क्षेत्रात दिव्यांगांना कमी लेखले जाते त्यात जिल्ह्यातील covid -१९ चे सर्व अधिकार जिल्हाधिकारी यांना दिले असल्याने अपंग जनता दल चे नांदगाव (खंडे) तालुका सचिव श्री.राहूल वानखडे यांनी जिल्हाधिकारी यांना केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय यांच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करून सामान्य रुग्णालय अमरावती व सर्व तालुका उप आरोग्य केंद्र ( ग्रामीण ) यांना लेखी आदेश काढून दिव्यांगांना प्रथम प्राधान्याने लसीकरण व्हावे अशी मागणी अपंग जनता दल सामाजिक संघटना नांदगाव खं तालुका सचिव राहुल वानखडे ऑनलाईन निवेदन माध्यतून केली आहे .