शेगाव: हिंदूंचा धार्मिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण नवरात्री उत्सव ,गरबा महोत्सव, साजरा करण्यास केवळ शेगाव शहरातच का मनाई करण्यात येत आहे ?असा सवाल शहरातील हिंदुत्ववादी संघटनांतर्फे विचारण्यात येत आहे.. याबाबत जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे तहसीलदार शेगाव यांच्या मार्फत सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, विश्व हिंदू परिषद,जय मातादी ग्रुप, शेगाव संघर्ष समिती, विविध संघटनांकडून पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्य मध्ये कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झालेला असून विशेषतः बुलढाणा जिल्हा सह विदर्भातील बहुतेक भागात कोरूना नामशेष झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सात आक्टोंबर घटस्थापनेपासून संपूर्ण राज्यातील धार्मिक स्थळे मंदिरे शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे पोलीस महसूल प्रशासनाने शेगाव येथे सार्वजनिकरीत्या नवरात्र उत्सव साजरा करण्यास तसेच दांडिया गरबा खेळण्यास मनाई करण्यात आलेली आहे. शेगाव शहर सोडून इतरत्र मात्र प्रशासनाकडून सार्वजनिक नवरात्र उत्सव आणि गरबा दांडिया उत्सव साजरा करण्यास कोरोना नियमांचे पालन करून सार्वजनिकरित्या साजरा करण्याची परवानगी प्रदान करण्यात आलेली आहे मात्र शेगाव येथे अशा प्रकारे उत्सव साजरा करण्यास प्रशासनाने बंदी आणलेली आहे हा एक प्रकारे शेगाव येथील हिंदू धर्म यावर प्रशासनाकडून अन्याय कारक कारवाई आहे संबंधितांनी या बाबीची दखल घेऊन शेगाव येथे सुद्धा कुरूना नियमांचे पालन करून नवरात्र उत्सव आणि गरबा दांडिया उत्सव साजरा करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे या निवेदनावर सार्वजनिक नवरात्र गणपती उत्सव मंडळाचे अध्यक्ष शेखर नागपाल, विश्व हिंदू परिषद प्रखंड प्रमुख विजय राठी, विश्व हिंदू परिषद शहराध्यक्ष प्रवीण मोरखडे, जय मातादी ग्रुप चे सोमेश कांबळे, शेगाव शंकर समितीचे विजय कुमार मिश्रा , प्रेस क्लब शेगावचे प्रशांत खत्री आदी विविध संघटनांचे पदाधिकारी यांच्या सह्या आहेत