पं.बंगाल मध्ये झालेल्या लोकशाही विरोधी कृत्याचा आमदार डॉ. संजय कुटे यांच्या नेतृत्वात भाजपाने केले “निषेध”आंदोलन…

0
276

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगांव जा.प्रतिनिधी:-अनिल भगत.
पश्चिम बंगाल मध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणूका संपन्न झाल्या.या निवडणुक निकालाच्या दरम्यान तृणमूल कोंग्रेस च्या गुंडांणी अनेक भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या झालेल्या हत्या, भाजपा कार्यालयाची झालेली तोड़फोड़,जाळपोळ याचा जळगांव जामोद मतदार संघाचे आमदार माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांच्या नेतृत्वात दिनांक ५ मे रोजी स्थानिक जळगांव जामोद तहसील जवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत कोवीड नियमांचे पालन करीत.पश्चिम बंगाल येथील गुंड शाहीचा निषेध अशा घोषणा देत. लोकशाही मार्गाने निषेध व्यक्त करून मारेकऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी निवेदणाव्दारे करण्यात आली आहे.निवेदनात नमूद आहे की,या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले व प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजपाला मान्यता मिळाली.भारतीय जनता पार्टिने लोकशाही मार्गाने जनतेचा विश्वास संपादन करून पं.बंगाल राज्यात आपले भरीव अस्तित्व तयार केले आहे.परंतु पश्चिम बंगाल मधिल या भारतीय जनता पार्टी च्या यशाने तृणमूल कोंग्रेस पक्षाची गुंडगिरी व हुकुमशाही विरोधात कौल दिल्याने आता तृणमूल कोंग्रेस कडून भाजपा कार्यालयाची तोडफोड व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मारहाण सुरु आहे. मारझोड़,जाळपोळ करून भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची हत्या करण्यात आली आहे. झालेल्या ह्या हत्या म्हणजे फक्त मानवी हत्या असून तृणमूल कांग्रेस ने केलेली लोकशाहीची हत्या आहे. त्यामुळे सर्व भारतीय जनता पार्टिचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या घटनेचा,तृणमूल कोंग्रेस चा तिव्र भावनेने “जाहिर निषेध” व्यक्त केला आहे.तसेच तृणमूल कोंग्रेस च्या ह्या हल्ल्यात गेल्या काही वर्षापासून हिंसाचारात बळी पडलेल्या भाजपा कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.तसेच या कठिन काळात पं.बंगाल मधील कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही खंबिर उभे राहून हा संघर्ष त्यांच्या एकटयाचा नसून लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकांचा आहे.त्यामुळे घड़लेल्या या लोकशाही विरोधी कृत्याचा,गुंडगिरी प्रवृत्तिचा भाजपा जळगांव जा.तालुक्याच्या वतीने पुन्हा एकदा “जाहिर निषेध” व्यक्त करून या समाज विघातक प्रवृतींवर कठोर कारवाई होण्यासाठी आपल्या स्तरावरुन योग्य कार्यवाही व्हावी.अशी विनंती निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.यावेळी आमदार डॉ. संजय कुटे, जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर अग्रवाल, तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ,शहराध्यक्ष अभिमन्यू भगत,तालुका युवा मोर्चा अध्यक्ष परिक्षित ठाकरे,सचिन देेशमुख,अक्षय देशमुख,उमेश येऊल,आशिष सारसर,गोटु खत्ती,कैलास पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राम इंगळे, कैलास डोबे,डॉ. प्रकाश बगाडे,गजानन सरोदे, बाळू चव्हाण,, पांडुरंग मिसाळ,सुरेश इंगळे, अरूण खिरोडकार अंबादास निंबाळकर यांची उपस्थिति होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here