सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट दि.4 जुलै मंगलाताई ठक महीला काँग्रेस तालुका अध्यक्ष व ज्येष्ठ नागरिक निराधार संघटनेचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या नेतृत्वात 5 जुलै सोमवारला धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
निराधांच्या समस्येबाबत खालील विषयावर
1) निरधांची उत्पन्न मर्यादा 21000 रुपये वरून 50000 रु. करणे
2) निराधार, शेतकरी 50 वर्ष वरील व त्याच्या पत्नीला 3000 रू मानधन देण्यात यावे
3) ड क्रमांक यादीतील ओबीसी ला घरकुल योजनेचा लाभ विशेष निधीतून देण्यात यावा
4) GR नुसार आधार कार्ड व डॉक्टर सर्टफिकेट हे श्रावण बाळ निराधार योजनेसाठी वयाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा.
5) निराधार लाभार्थी यांना
1 वर्षात फक्त 6 महिन्याचे 6000 रुपये मानधन मिळाले , मग बाकीचे पैसे कुठे गेले ? या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी ?
इत्यादी समस्याच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे .
मोठ्या संख्येने लाभार्थ्याने या धरणे आंदोलनात सहभागी व्हावे असे आव्हान मंगला ताई ठक यांनी केले .