महापुरुषांचे विचार आत्मसात करून गुण्यागोविंदाने रहावे – भाजपा प्रदेश प्रवक्ते विनोद भाऊ वाघ

0
211

 

लोणार/जगन पाटील

लोणार तालुक्यातील शिंदी या गावी मागील काही वर्षापासून दोन समाजातील जातीय तेढ निर्माण झाली होती त्यामध्ये अधुन मधून दोन समाजांमधील वाद नेहमीच होत असत 2009 पासून या वादाची ठिणगी पडली होती गावाच्या मध्यभागी असलेली सहा गुंठे जागा या वादाचा प्रमुख मुद्दा आहे या सहा गुंठे जागा वर जागेवर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी सदरील जागाही महामानवांच्या स्मारकासाठी आरक्षित करून ठेवली होती परंतु गावातील मराठा समाजाने यावर आक्षेप घेतला आणि सदरील जागा ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी आहे या दोन वेगवेगळ्या विचार प्रवाहातून सदरील दोन समाजातील वाद हा पेटला होता या वादाच्या पोलीस स्टेशन ते न्यायालय असा या वादाचा प्रवास पूर्ण झालेला असतानाही हा वाद मिटवण्याचे नाव घेत नव्हता‌.
शेवटी दोन्ही समाजातील नेत्यांनी हा वाद सामंजस्याने मिटवण्यासाठी गावकऱ्यांना सोबत घेऊन गाव विकासासाठी व हितासाठी दोन जाती मधला वाद हा योग्य नाही त्या अनुषंगाने या वादावर तोडगा काढण्यासाठी पोलिस प्रशासन नेतेमंडळी पंचायत समिती या सर्वांच्या पुढाकाराने हा वाद मिटविण्यात आला व शेवटी 70 टक्के जागा ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी तर उर्वरित 30 टक्के जागा ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी अशी विभागणी केली गेली गावकऱ्यांच्या दृष्टीने हा वाद संपविण्यात आला.दोन महापुरुषांच्या स्मारकासाठी वाद न घालता त्यांचे विचार आत्मसात करून गुण्यागोविंदाने राहून गावाचा विकास करावा.
हा वाद मिटवीसाठी प्रमुख्याने भाजपा प्रदेश प्रवक्ते विनोद भाऊ वाघ,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.बळीरामजी मापारी,कृषी उत्पन्न बाजार �

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here