सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )
कोरोना चा वाढता संसर्ग लक्षात घेता बुलढाणा जिल्ह्यामध्ये 21 फेब्रुवारी पासून लॉकडाउन घोषित करण्यात आली आहे ‘अनेक ठिकाणी निर्बंध सुद्धा घालण्यात आले आहे ‘यामध्ये सिनेमागृहे वायम शाळा तलाव नाट्यगृह आदी सर्व बंद करण्यात आली आहे ‘तर एसटी मध्ये सुद्धा 50 टक्के प्रवासी लाच परवानगी देण्यात आली आहे ‘तर मंदिरामध्ये फक्त दहा व्यक्तीलाच परवानगी आहे ।मागील वर्ष हे कोरोना च्या सावटाखाली गेले ‘त्यानंतर कोरोना चा संसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाला व त्यानंतर हळूहळू राज्य सरकारने लॉक डाउन उठवल्यानंतर ‘सर्व काही सुरळीत झाले ‘यामध्ये महत्त्वाचे म्हणजे विवाह सोहळा होय ‘मागील लॉकडाऊन मध्ये साध्या पद्धतीने विवाह करणारे लॉक डावून उठल्यानंतर मात्र धाम धूम मध्ये लग्न करायचं या इराद्याने मैदानात उतरले होते ‘अनेक विवाह सोहळे हे ‘हजारो लोकांच्या उपस्थितीत पार सुद्धा पडले .त्यावेळी तशी परवानगी होती ‘अनेक नवरी व नवरदेव ज्या मुलांचे, मुलींची लग्न जुळलेत्यातील अनेक मुलांना असे वाटले की या वेळेस आपण धुमधडाक्यात लग्न करू ‘अनेकांनी महागडा डीजे .गाड्या सुद्धा बुक केल्या होत्या ‘अनेकांनी ॲडव्हान्स देऊन मंगल कार्यालय सुद्धा बुक केली होती .तर अनेक नवरदेवांनी नवरीच्या घरच्यांना फोन करून महागडा मंडप टाकण्याचे सुद्धा सांगितले होते ‘तर अनेक वधूपिता नी आपण अनेक नातेवाईकांना आंदन भांडे वाटप केले या आशेने आपल्या मुलीचे लग्न धुमधडाक्यात करू असे ठरवले होते ‘अनेकांनी डिझाईन व आकर्षक अशा महागडे पत्रिका सुद्धा छापल्या तर काही वाटल्यास सुद्धा ‘परंतु अचानक करुणा चा प्रादुर्भाव संपूर्ण महाराष्ट्रमध्ये वाढला बुलढाणा जिल्ह्यामध्ये वाढला ‘व जिल्हाधिकारी यांना 21 फेब्रुवारीपासून घोषणा करावी लागली ‘व वधू वरा कडील असे दोन्ही मिळून फक्त २५ जनांच्या उपस्थितीतचआता लग्नाचा कार्यक्रम उरकून घ्यावा लागणार आहे ।त्यामुळे ज्या वधू वरा कडील मंडळींनी लग्नाची तयारी केली होती त्यांचा मात्र पुरता हिरमोड झाल्याचे सध्या तरी दिसत आहे तर अनेक वधूपिता यांनी मंगल कार्यालय रद्द केले आहे ‘तर काहींनी जे झालं ते चांगलंच झालं अशी प्रतिक्रिया दिली आहे ।