सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )
मेहकर तालुक्यातील सातशे ते आठशे लोकवस्तीचे गाव असलेल्या सावंगी विर येथे .दलित वस्तीत असणारे जीर्ण व पडीत असलेली विहीर बुजविण्याची मागणी .स्थानिक नागरिकांनी .सरपंच व सचिवास निवेदन देऊन केली आहे
दलित वस्तीतील नागरिकांना या पडित विहिरी मुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे जीव धोक्यात घालून रात्रीच्या वेळेला वाट काढत घरापर्यंत यावे लागत आहे .
झी रणविहिर 50 ते 60 वर्षांपासून पडीत असून .
ही विहीर अतिशय धोकादायक बनली आहे ‘
ही विहीर पडित असल्यामुळे सर्व गावातील घाण या विहिरी मध्ये लोक टाकत आहे .
त्यामुळे टाकलेल्या घाणीमुळे आसपासच्या घरांमध्ये दुर्गंधी येत असून त्यामुळे गावात मच्छरांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे ‘
त्यामुळे डेंगू चे आजार उद्भवण्याचा धोका निर्माण होऊ शकतो ‘
तसेच लहान लहान मुले सुद्धा विहिरीमध्ये डोकावून पहात असल्यामुळे मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे ‘
अगोदरच कोरोणाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत असताना ‘
पंडित विहिरी मुळे गावात दुर्गंधी सुटून गावात आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे ‘
एखादे अपघात झाला एखाद्या व्यक्ती बिमार पडला तर याला जबाबदार कोण ? असेही या निवेदनात म्हटले आहे
सचिव व सरपंच एक महिना झाला तरी अजून दिलेल्या निवेदनावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही त्यामुळे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्यात येईल असा इशारा शेवटी दिला आहे !
त्यामुळे ग्रामपंचायत सरपंच व सचिव काय कारवाई करतात याकडे हे पाहणे औचित्याचे ठरेल ‘तसेच पडीत असलेल्या विहिरीचा कुठल्याही प्रकारचा उपयोग नसताना ती विहीर काम बुजवत नाही हा प्रश्न आहे ?
या निवेदनावर .समाधान सुखदाने .
श्रीकृष्ण सुखदाने,सिताराम सुखदाने, प्रभाकर सुखदाने,विजय सुखदाने, शैलेश सुखदाने, शुद्धोधन सुखदाने ‘आधीच्या सह्या आहेत ‘