संग्रामपूर/-मेळघाट व्याघ्र प्रकल्प अकोट वन्यजीव विभाग अंतर्गत येणाऱ्या वन अभयारण्य मध्ये दिनांक 3 व 4 एप्रिल रोजी अज्ञात इसमांनी अवैधरीत्या आग लावली होती . सदर आगीमध्ये वान परीक्षेत्रात प . तलई बिट मधील वनखंड क्र . 1249 , 1248 , 1239 एकुण 163 हेक्टर क्षेत्र जळाले तसेच सोनाळा परीक्षेत्रातील सालवन सर्वे नंबर 44,45 मधील एकुण 153 हेक्टर क्षेत्र जळाले होते . त्याअनुषंगाने त्या बाबत वनगुन्हा क्र . अन्वये भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 ( 1 ) ब , वन्यजिव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 27,29,30,51 ( I – C ) अन्वये वनगुन्हा जारी करण्यात आला होता .
वन विभागाला गुप्त माहीती नुसार प्रकरणातील संक्षयीत इसम नामे गंगाराम थानसिंग नरगावे वय 24 वर्ष, 2. रुफानसिंग गुमानसिंग नरगावे वय 38 वर्ष दोन्ही रा . रोहीणखीडकी ता . संग्रामपुर जि . बुलडाणा यास ताब्यात घेवून चौकशी केली असता आरोपींने मेळघाट व्याघ्र प्रकल्प , अंबाबारवा व वान अभयारण्यात अवैधरीत्या गोंद गोळा करण्याच्या उद्देशाने ने सालई झाडांना करवे करुन आग लावण्याबाबत कबुली दिली आहे . त्यांनी दिलेल्या कबुली जबाबावरुन त्यांना अटक करुन न्यायालय संग्रापुर येथे हजर केले असता न्यायालयाने दिनांक 17 ते 20 एप्रिल पर्यत वनकोठडी सुनावली आहे . सदर प्रकरणी तपासादरम्यान इतर इसमही सदर गुन्हयात सामील असल्याचे निष्पन्नास आले असुन त्या अनुषंगाने पुढील तपास सुरु आहे .