सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )
येथून जवळ असलेल्या उंद्रीसर्कल मधील 18 गावातील वीज बिले न भरल्याने पथदिवे महावितरण ने बंद केले होते. त्यावर प्रदेश कांग्रेस अनु जाती विभाग नेते, व उंद्रि ग्रा प सरपंच भाई प्रदीप अंभोरे यांनी महावितरण कंपनी यांच्याकडे पथदिवे सुरू करण्याची मागणी केली होती. त्यावर त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता त्यावर दिनांक बारा एप्रिल रोजी महावितरण कंपनीने दखल घेऊन अखेर उंद्री व सरकारमधील 18 गावातील बंद पाडलेले पथदिवे सुरू केले आहे.
या महिन्यांमध्ये विविध महापुरुषांच्या जयंत्या रामनवमी गुढ़ी पड़वा, रमजान अशा धार्मिक सणावर पहिलेच कोरोणामुळे विरजण पडले आहे यातच महावितरण कंपनीने वीज बिले उंद्रि व सरकलमधील अठरा गावातील ग्रामपंचायतीचे पथदिवे बंद केले होते. सदर पथदिवे सुरू करण्यासाठी भाई प्रदीप अंभोरे यांनी मा.उद्घव ठाकरे मुख्यमंत्री,मा.ऊर्जा मंत्री नितीन राऊत आदिक डे व महावितरण कंपनी बुलढाणा यांच्याकडे आंदोलन निवेदन देऊन केलेली मागनी ची दखल घेऊन पथदिवे सुरू केल्याने उंद्रिसह 18 गावामध्ये पथदिवे सुरू झाले आहे. हे पथदिवे सुरू करण्यासाठी उप अभियंता चिखली भुसारी व कनिष्ठ अभियंता जाधव याना वरिष्ठ अभियांत्यान्नी केलेल्या आदेशानुसार त्यान्नी उंद्री वैरागड़ सह 18 गावतिल पथ दिवे सुरू केले यावेली शिवाजी पाटिल ग्राप सदस्य राम नसवाले, आकाश राऊत स्वा.शे.स.पत्रकार वसंत सिरसा ठ आदि तरुण उपस्थित होते.