प्रियंका पवार (मुम्बई प्रतिनिधि)
यांच्या संयुक्त विद्यमाने , ३१ जुलै रोजी स्व . गायक मोहम्मद रफी साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त घेण्यात आलेल्या , स्पर्धेत १९ स्पर्धकांनी सहभाग घेऊन , मोहम्मद रफी साहेबांच्याच गाण्यातून रफी साहेबांना श्रद्धांजली वाहिली . साहित्याच्या ग्रुपला चारोळी , कविता , पत्रलेखन , लेख , गझल हे साहित्य आपण पोस्ट करत असतो , काव्यरसिक साहित्य वाचत असतो , साहित्यिकांच्या मनातील भाव ओळखून , त्यांच्या अंगी असलेली गायन कला जाणून , या पेक्षा ही वेगळं काहीतरी म्हणून , ३१ जुलै रोजी स्व . गायक मोहम्मद रफी साहेबांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून , या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन अविनाश शिंदे , अनिल केंगार यांनी केले . या स्पर्धेत प्रिया भालके , रझिया जमादार , मीना पांचाळ , डॉ . गणेश भोसले , आनंदहरी सर , संजय जाधव , मेहबूब जमादार , वंदना हटवार राऊत , स्वाती लोहकरे , धनंजय माने , प्रमोद सूर्यवंशी , सौ , सुनिता बहिरट , रुकसाना मुल्ला , वर्षा फटकाळे वराडे , आम्रपाली धेंडे , संतोष रायबान , शबाना मुल्ला , रोहिणी गंधेवार , संगीता इंगवले या स्पर्धकांनी सहभागी होऊन , स्पर्धेला रंगत आणली . कार्यक्रमाला उपस्थित असलेले श्रोते , यांनीही कार्यक्रमाला आपल्या शैलीतून दाद दिली . रसिक श्रोते असल्याशिवाय कार्यक्रमाला पण रंगत येत नाही . या कार्यक्रमासाठी निवेदक म्हणून मा . प्रवीण बनसोडे यांनी आपल्या निवेदन शैलीतून , कार्यक्रमाला चार चाँद लावले . आणि या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून गायक मा . दिपकराज साळुंखे यांनी काम पाहिले . प्रथम क्रमांक डॉ . गणेश भोसले , द्वितीय क्रमांक संगीता इंगवले , तृतीय क्रमांक विभागून प्रमोद सूर्यवंशी , रुकसाना मुल्ला , उत्तेजनार्थ वर्षा फटकाळे वराडे , शबाना मुल्ला , मेहबूब जमादार . अशा प्रकारे स्पर्धेचा निकाल जाहीर करून , सर्व सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा देऊन , परीक्षकांनी रफी साहेबांची गाणी गायली .