जळगाव जा :- २८ जुन रोजी बुलढाणा जिल्ह्याचे कलेक्टर तुम्मोड साहेब जळगाव जामोद तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता शेतकरी या नात्याने रिपाईचे युवा जिल्हा अध्यक्ष प्रशांत तायडे आणि तालुक्यातील शेतकऱ्यांनी कलेक्टरच्या समोरच आपल्या समस्या मांडल्या… विशेषतः पेरणी पावसाचे दिवस जवळ येवून सुद्धा शेतकऱ्यांना हवे ते बि बियाने बाजारात मिळत नसुन त्याची कृत्रिम टंचाई निर्मान केल्या जात आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने नको ते बायाने घ्यावे विकत घ्यावे लागत आहे.
एकीकडे जिल्ह्यात अधीकाऱ्याकडून जिल्ह्यात बी बीयाने मुबलक स्वरूपात आहे असे सांगितले जाते तर दुसरीकडे अशा प्रकारे कृत्रिम टंचाई निर्माण केल्या जात आहे. त्यामुळे अगोदरच हवालदार झालेला बळीराजा फार अस्वस्थ झाला आहे.
सभ्रमाअवस्थेत सापडलेल्या शेतकरी राजा एकप्रकारे संकटात सापडला आहे.त्यामुळे अशा संकटात सापडलेल्या बळिराज्याच्या प्रश्नाकडे आपण गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. हवे ते सोयाबीन व कपाशी वान बाजारात उपलब्ध होईल यावर पावाले उचलून कृषी केन्दा मार्फत जो बियानांचा कृतीम तुटोडा निर्मान केल्या जात आहे तो दुर करून शेतकरी राज्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.
यामध्ये प्रशासनातील अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी कागदोपत्रीच कागदांचा बाजार मांडत असून, बाजारा मुबलक बियाने उपलब्ध असल्याचे शेतकऱ्यांना भासवत आहेत.एकप्रकारे ते शासनाची आणि शेतकऱ्यांची फसवणूकच करत आहे.कृषी विभागा मार्फत खोटी माहिती आणि चुकिची माहिती आपणाप्रयंत कागदोपत्री पोहचवल्या जात असून वास्तव मात्र वेगळ आहे.प्रत्येक तालुक्यातील अधीकारी आपणास कागदोपत्री खोटी माहीती देत आहे.
हे जीवंत वास्तव सर्व शेतकऱ्यांनी जिल्हा आधिकारी यांना सांगितले.
रुची १००१ सोयाबीन चे वान व असेच आधिक उत्पन्न देणारे बियाने बिजारात उपलब्ध नाही तेव्हा अशा बियाण्याची उपलब्धता होण्यासाठी आपल्या स्तरावरुन त्वरीत पावले उचलावी,तसेच अनेक शेतकऱ्यांचे शेत रस्त्याचे दावे महसुल विभागाकळे अनेक वर्षापासुन प्रलबित आहे ते दावे पेरणी वजळ येवून सुद्धा प्रलंबीत आहे,
त्याकळे सुद्धा आपन लक्ष देवुन प्रलंबीत दावे तात्काळ निकाली काढावे यासह अनेक समस्याचा पाढच जिल्हा अधिकाऱ्यांच्या समोर कथन केला.विशेषतः एक शेतकरी या नात्याने आर.पी.आय.युवा जिल्हा अध्यक्ष प्रशांत तायडे यांनी या महत्त्वाच्या मागणी साठी जिल्हा आधिकारी याची भेट घेवून चर्चा केली.व या बाबीकडे कलेक्टरचे लक्ष वेधले. शेतकऱ्यांना विश्वासात घेत जिल्हा अधीक्षक यांनी सांगितले की,कृषी विभागाला या बाबत अलंर्ट केले जाईल व प्रलंबित शेत रस्ते दावे बाबत जळगाव महसूल विभागाला तशा सुचणा केल्या.तसेच शेतकऱ्यानी जो प्रयत्न पेरणीयोग्य पाऊस होत नाही तोप्रयंत पेरणी करूच नका असा सल्लाही यावेळी कलेक्टर महोदयांनी शेतकऱ्यांना दिला.
यावेळी प्रशांत तायडे,अक्षय पाटिल, भास्कर भटकर, प्रभाकर वानखडे ,अनिकेत पाटील, बाळु दामोधर इत्यादी शेतकरी उपस्थीत होते



![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)




