शासनाच्या नियमाचे पालन करावे ठाणेदार जितेंद्र आडोळे व सरपंच दाऊत सेठ कुरेशी यांचे आव्हान !
सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )
सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोना च्या पार्श्वभूमीवर जमाबंदी व संचारबंदी लागू झाली आहे ‘तसेच प्रत्येक ठिकाणी वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता प्रशासनाने सुद्धा काल रात्रीपासून आदेश जारी केली आहे ‘तसेच दहा एप्रिल पर्यंत असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे सुद्धा लोक हैराण झाले असून उष्णतेपासून पासून वाचण्यासाठी लोक शेतातील लिंबाच्या वआंब्याच्या झाडाचा आश्रय घेत आहे ‘सूर्य आग ओकू लागल्या मुळे अंगाची लाही लाही होत असून .मधेच लाईट हि जात असल्यामुळे लोक आणखीन परेशान झाली आहे .त्यामुळे व कोरोना ची संख्या वाढत असल्यामुळे साखरखेर्डा येथील बस स्थानकावरील सर्व दुकाने अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णपणे बंद होती ‘म्हणजेच कोरोना ची लहर व उष्णतेचा कहर यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले होते .अनेक लोकांनी कोरोना मुळे व उष्णतेच्या लाटेमुळे प्रवास करणे टाळले आहे तर शासनाच्या दिलेल्या नियमाचे काटेकोरपणे लोकांनी पालन करावे असे आव्हान साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री जितेंद्र आडोळे व साखर खेडा ग्रामपंचायत सरपंच दाऊत सेट कुरेशी यांनी केले आहे ‘