गजानन सोनटक्के जळगाव जा
कोरोना चा कहर सुरूच आहे पंधरा ते वीस दिवसांवर पेरणी येऊन ठेपली आहे दिवसभर बंद त्यामुळे पीक कर्ज बियाने खते आदींचे कामकाज कसे पार पडावे असा प्रश्न आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पडलेला आहे मागील वर्षापासून सुरू झालेले कोरोना संकट थांबायला तयार नाही सध्या मे महिन्याला सुरुवात झाली असून शेतीविषयक कामे उरकून पिक कर्ज सावकारी उसनवारी कर्ज यासारखे व्यवहार आणि यासोबतच बाजारपेठेत जाऊन खरीप हंगामाकरिता बी-बियाणे खते आदी तयारीला शेतकरी महत्त्व देतात परंतु यामुळे खरिपाच्या तयारीवर मोठा परिणाम होत आहे लॉकडावून काळात बँकेच्या वेळ मर्यादित आहेत बँकांना लागणारे कागदपत्र करिता कार्यालयात जाणे तिथे सध्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी असणे यामुळे तोंडावर आलेल्या खरीप पेरणीचे नियोजन कसे करावे या विवंचनेत शेतकरी सापडला आहे संचार बंदी मुळे सर्व दुकाने कालपर्यंत सात ते अकरा पर्यंत सुरू राहून बंद होतात त्यामुळे यांची चौकशी सुद्धा करणे कठीण झाले आहे व आता सुरू झालेला लॉकडाऊन त्यातच नैसर्गिक नापिकी व दुष्काळामुळे आर्थिक संकट असल्याने काय करावे असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडलेला आहे पेरणीचे दिवस जवळ जवळ येत आहे तरी खरीप हंगाम हातातून गेल्यास कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या चिंतेत शेतकरी जीवन जगत आहे शासनाने यासंदर्भात कृषी निविष्ठा वेळेत सूट देऊन सर्वतोपरी आर्थिक मदतीचा हात देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज भासत आहे त्यातच शेतकऱ्यांना सरकारकडून पीक विमा किंवा कोणतीच मदत मिळाली नाही परिणामी शेतकरी हा मोठ्या कोंडीत सापडला आहे व येणारा खरीप हंगामाचे नियोजन कसे करावे याचा प्रश्न जळगाव जामोद परिसरातील शेतकऱ्यांना पडत आहे







