सचिन वाघे वर्धा
महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आला सुरुवातीला राज्य सरकारन 15 मे पर्यंत लॉक डाऊन जाहीर केला त्यानंतर त्यात वाढ 1 जून 2021पर्यंत लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत हा लॉक डाऊन असेल आता हा लॉक डाऊन संपायला अवघे आठ दिवस उरले आहेत त्यामुळे एक जून राज्यात लॉक डाऊन ची कशी स्थिती असेल लॉक डाऊन संपेल की वाढेल असे प्रश्न जनतेला पडू लागले आहेत याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत
ज्या जिल्ह्यामधील कोरोना रुग्ण संख्या कमी आणि मृतांचा आकडा कमी असेल त्या – त्या जिल्ह्यांमध्ये एक जून नंतर लॉक डाऊन नियमा मध्ये शिथीलता देणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले