ग्रामीण भागातील आरोग्य विभागाच्या नविन उपकेंद्राचे इमारती वैद्यकीय अधिकारी विना बेवारस

0
234

 

हंसराज उके अमरावती

अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागाने लाखो रुपये खर्च करून ग्रामीण भागातील खेडेगावात नविन उपकेंद्राच्या इमारती उभ्या झालेल्या असुन गेले त्या उपकेंद्रामधे वैद्यकीय अधिकारी,स्टाॅप नर्स, व इतर कर्मचारी नसुन कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिकां मधे
चर्चा होत आहे.आज कोरोणाच्या
काळात या उपकेंद्राच्या इमारती उपयोग काय ? असा प्रश्न जनसामान्य नागरिका पुढे उभा आहे.कोरोणा महामारिच्या जिव घेण्यात बिमारीत होत नसेल तर
या भव्यदिव्य बांधण्यात आलेल्या
उपकेंद्राच्या इमारतीचा उपयोगच
काय?अशी चर्चा जनसामान्य नागरिका मधे होत असल्याचे दिसुन येत आहे आज जर या उप केंद्रात जर आरोग्य योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या आरोग्याला पोषक योजनेचा लाभ घेता आला असता
तसे न होता ग्रामीण भागातील खेडेगावातील सर्वसामान्य नागरिक हा शहरातील खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार घेण्यासाठी जावं लागलं आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरातील पैसा या दवाखान्यात जातं आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांना अर्थीक प्रश्र्न उभा राहिला आहे व गेले दिड वर्षांपासून कोरोणा सारख्या महाभयंकर बिमारी मुळें रोजगार गेले शासन एकीकडे अनेक योजना राबविण्यात पण या मुठ योजना सर्वसामान्यांसाठी पर्यंत पोहोचत आहे की नाही त्यामुळे सर्वसामान्य लोकांना अर्थीक मदतीची आज तरी गरज आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला या आर्थिक योगदान होईल तरी शासनाने ग्रामीण भागात लक्ष देण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here