पातुरडॉ गावातील बऱ्याच वर्षांपासून बुलढाणा, जळगाव जामोद, अकोट,तेल्हारा या मुक्कामी बसेस सुरू होत्या मात्र मागील वर्षी पासून कोरोना सुरू झाला व वरील सर्व अगाराच्या बसेस बंद करण्यात आल्या या मुळे जनतेला,ये जा करणाऱ्या नागरिक,कर्मचारी याना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे हे माहिती पडताच जणतेते निवडून दिलेल्या व सध्या प स संग्रामपूर सभापती पदावर असलेल्या सौ रत्न प्रभा ताई धर्मळ यांनी जिल्हा आगार प्रमुख याना निवेदन दिले असून जनतेला त्रास झाल्यास तुमची गाठ माझ्या शी राहील असा इशारा पण दिला आहे
पातुरडॉ हे गाव वीस हजार लोकसंखेच्या आस पास असून या गावाला 30 च्या वर खेडे पाडे लागू आहेत पातुर्डॉ हे गाव सर्वात मोठे असल्यामुळे येथुनच सर्व गावातील दळण वळण व इतर वाबीच्या सुख सुविधा त्या गावाला मिळतात येथे मागील तीस ते पस्तीस वर्षांपासून अकोला,जळगाव जामोद,बाळापूर,बुलढाणा, अकोट,तेल्हारा या अगराच्या मुक्कामी बसेस सुरू होत्या त्या सकाळी 6 ते 7 च्या दरम्यान येथून निघून जायच्या या मुळे विद्यार्थी, येणे जाणे करणारे नागरिक,कर्मचारी,बुलढाणा येथे जिल्हा लेवल वर असणारे ऑफीस मध्ये काम असणारे नागरिक,अकोला येथे दवाखाना,दूर च्या पाल्यावर जाणारे प्रवासी,व रेल्वे चा प्रवास करणारे नागरिक,विद्यार्थी यांच्या साठी या सर्व आगार च्या बसेस फायद्याच्या ठरत होत्या व या सर्व आगार ला या पासून इन्कम पण चांगले येत होते मात्र मागील वर्षी पासून कोरो ना या महामारी मुळे या बसेस बंद पडला तर मधात काही दिवस सुरू झाल्या व आणखी बंद पडल्या या सर्व आगार च्या बसेस बंद असल्यामुळे जनतेला खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो या मुळे आर्थिक नुकसान पण जास्त प्रमाणात होते तर जनतेला नाहक त्रास पण सहन करावा लागत आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे एक ब्रीद वाक्य आहे की एस टी ही सेवा साठी आहे मात्र तसे काही दिसत नाही या बसेस आता स्वतःच्या फायद्याचा विचार करत असून जनतेचे त्यांना काही घेणे देणे नाही सर्व आगार च्या बसेस बंद आहे हे माहिती पाडताच प स संग्रामपूर च्या सभापती सौ रत्न प्रभा ताई धर्माळ याना माहिती पडताच त्यांनी लगेच जिल्हा आगर प्रमुख याना निवेदन दिले व बसेस पुर्ववत सुरू करा अन्यथा गाठ माझ्याशी राहील असा इशारा दिला जनतेला त्रास झाला नाही पाहिजे तो मी सहन करणार नाही
निवेदनाच्या प्रति आगार प्रमुक जळगाव जामोद,बुलढाणा याना दिल्या आहेत