जिल्हाधिकारी घेणार कृषि अधिकारी व पिक विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींची तत्त्काळ बैठक आठ दिवसात समस्या सोडविन्याचे जिल्हाधिकारी यांचे आश्वासन
जिल्ह्यात 2,95,000 वर पिक विमा धारक शेतकरी
*अजहर शाह*
*बुलडाणा*:-
पिक विमा कंपन्यानी राज्यात हजारो कोटी ची नफेखोरी करत शेतकऱ्यांना पिक विम्या च्या लाभा पासून वंचित ठेवले आहे.बुलडाणा जिल्ह्याची सर्व तालुक्याची आनेवारी 50 % खाली आलेली असून खरीप हंगाम 2020- 21 मधील जवळपास 2 लाख 95 हजारा पेक्षा जास्त विमा धारक शेतकऱ्यांची पिक विमा कंपनी फसवणूक करीत असल्याचा आरोप भाजपा नेते विजयराज शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांची 24/5/2021 भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे केला आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्हयाची आनेवारी 50% पेक्षा खाली असल्याने विम्याचा क्लेम 72 तासाच्या आत करण्याची जाचक अट विमा कंपनीने रदद् करून ग्राम पातळी वरील सरकारी पंचनामे प्रमाणभूत माणुन पिक विमा धारक शेतकऱ्यांना त्यांची हक्काची नुकसान भरपाई विमा कंपन्याणी दिलीच पाहिजे अशी मागणी यापूर्वी मागील महिन्यात जिल्हाधीकारी यांच्या कड़े भाजपा नेते विजयराज शिंदे यांनी भाजपा किसान मोर्च्याच्या वतीने लावून धरली होती.
मात्र महीना उलटत आला तरी या बाबत कोणतीही कार्यवाही जिल्हा प्रशासनाने केली नसून पिक विमा कंपन्याना विशिष्ठ हेतुने पाठीशी घालण्याचा प्रकार कृषि विभाग करत आहे.
झालेल्या चर्चे प्रसंगी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा कृषि अधिक्षक व संबंधित पिक विमा कंपन्याची तत्त्काळ बैठक बोलावून हा प्रश्न येत्या आठ दिवसात निकाली काढू असे आश्वासन मा.आमदार विजयराज शिंदे यांना दिले आहे.
निवेदनात नमूद आहे की,
मि आपणाकडे 30/4/2021 रोजी निवेदन देऊन बुलडाणा जिल्ह्यातील पिक विमा काढलेल्या सर्वच शेतकऱ्यांना स्थानिक ग्राम पातळी वरील पंचनामे ग्राह्य धरून विम्या पोटीची हक्काची रक्कम मिळणेसाठी मागणी केली होती.सदर बाबतित मा.जिल्हाधिकारी यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांना “योग्य मुदत काळात तात्काळ कारवाई करणे” बाबत आदेशीत केले होते मात्र जिल्हा कृषी अधिकारी यांनी याबाबत दिरंगाई करत माझ्या पाठपुराव्या नंतर तब्बल विस दिवसानी 21/5/2021 रोजी पत्र विमा कंपनीला पत्र पाठवून अहवाल मागितला आहे.
सर्वच पिक विमा कंपन्या ह्या शेतकऱ्यांच्या जिवावर प्रचंड नफाखोरी करीत असून या कंपनीच्या संचालकां सोबत कृषि विभागातील अधिकाऱ्यांचे आर्थिक हित संबंध जोपासले तर जात नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यातील 2020-21 खरीप हंगामातील पीक विमा कंपनीच्या व्यवसाया बाबत पुढील प्रमाणे माहिती मिळते.(11/5/2021) पर्यंतची
सहभागी शेतकरी- 1.19 कोटी
सरंक्षित क्षेत्र- 64.85 लाख हेक्टर
वसूल विमा हफ्ता- 5801 कोटी रुपये
शेतकऱ्यांना भरपाई- 12.30 लाख
भरपाई वाटली – 823 कोटी
कंपन्यांना नफा – 4969 कोटी
म्हणजेच राज्यातील पिक विमा कंपन्यानी हप्त्यापोटी जमा केलेली रक्कम ही शेतकऱ्यांना देय असलेली भरपाई रक्कमेच्या खूपच कमी आहे.
ह्या कंपन्या एका हंगामात जवळपास 5 हजार कोटी रुपयांची नफेखोरी करीत आहे.
बुलडाणा जिल्ह्यात खरिप हंगाम 2020-21 मध्ये पिक विमा मध्ये सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या 2,95,157 एवढी आहे
प्राप्त माहिती नुसार राज्य शासनाने स्थानिक पंचनामे प्रमाणभूत मानून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ची रक्कम देण्याबाबत या पूर्वीही कळविलेले असताना सदर कंपन्या ह्या आदेशास केराची टोपली दाखवून चार चार महिने शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची पीक विम्याची रक्कम देण्यास टाळत आहे.
पिक कर्ज घेतांनाच शेतकऱ्यांच्या कर्जाच्या रकमेतून परस्पर पिक विम्याची रक्कम कपात करून कंपनीकडे जमा होत असते.ह्या पिक विम्याच्या हप्त्यात शेतकरी व केंद्र शासन यांचा संयक्तिक वाटा असतो. त्यामुळे सदर कंपन्या ह्या पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देतांना जी टाळटाळ करत आहे ही बाब “नैसर्गीक आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005” मधील तरतूदिंचा भंग करीत आहे.
तरी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे स्थानिक पातळी पंचनामे प्रमाणभूत मानून शेतकऱ्यांना पिक विम्याची नुकसान भरपाई ची रक्कम तात्काळ मिळवून द्यावी तसेच शेतकऱ्यांची व शासनाची फसवनुक करून आर्थिक वेठीस धरणाऱ्या सदर पिक विमा कंपन्यांच्या संचालकांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करावी.
अन्यथा लोकशाही मार्गाने येणाऱ्या आठ दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यां समवेत ठिय्या आंदोलन करण्यात येईल याची दखल घेण्यात यावी असा इशारा पुनश्चः भाजपा नेते विजयराज शिंदे यांनी जिल्हा प्रशासणाला दिला आहे. या वेळी भाजपा किसान मोर्च्याचे प्रदेश सचिव दीपकजी वारे यांचीही उपस्थिति होती.