अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील दानापूर या गावातील जातीय द्वेषातून होणार्या अत्याचाराच्या निषेधार्थ दानापूर येथील शंभर दलितांनी शुक्रवार 22 ऑक्टोंबरला गाव सोडून निषेध केला आहे. यावेळी या बांधवांनी गावालगतच्या पाझर तलावा जवळ मुक्काम करावे लागले असून, पून्हा गावात परतणार नाही असा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे गावातील त्यांच्या मालमत्तेच्या सरक्षणाची जबाबदारी ही प्रशासनाची राहील असे त्यांनी लेखी प्रशासनाला कळविले आहे. दानापूर येथील दलित बांधवाची दानापुर शेत शिवारात शेती आहे. याच शिवारात मुख्य सरकारी पांदणच्या एक शेत पलीकडे या दलितांची शेती आहे. परंतु गावच्या सवर्णांनी या दलितांना त्यांच्या शेतात जाणारा पिढीजात वहीवाटीचा रस्ताच बंद केला. त्यामुळे त्यांची मशागत व इतर शेती कामे खोळंबली. ऐन पेरणीच्या वेळी ट्रॅक्टर अडवुन त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप दलित बांधवांचा आहे.
या कारणाने दानापूर गावातील जातीय द्वेषातून होणार्या अत्याचाराच्या निषेधार्थ गावातील शंभर दलितांनी गाव सोडून निषेध केला होता.पण २३ ऑक्टोंबर रोजी उशिरा रात्रीच्या वेळस प्रशासनाच्या आश्वासना नुसार दलित बांधव घरी परतले . पण आज दिनांक 24 ऑक्टोंबर रोजी अकरा वाजताच्या आजाद समाज पार्टीचे महाराष्ट्र मुख्य महासचिव मनीष भाऊ साठे,यांच्या मार्गदर्शनात आजाद समाज पार्टीचे पद अधिकारी व कार्यकर्ते व भीम आर्मी चे पदाधिकारी व कार्यकर्ते या गावात जाऊन पीडितांना घटनेची माहिती घेऊन पीडितांना तुमच्या आजाद समाज पार्टी खंबीर पणे उभी आहे आणि पूर्ण आंबेडकरी समाज पुमच्या पाठीशी आहे अशे आश्वासन दिले त्यावेळी आजाद समाज पार्टीचे अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष प्रफुल डोंगरे, भीम आर्मी भारत एकता मिशन चे अमरावती जिल्हा अध्यक्ष रितेश तेलमोरे अमरावती शहर युवक अध्यक्ष सुमित थोरात, अमरावती शहर युवक महासचिव गौतम वले, अमरावती शहर युवक सचिव जंजिर सिंग टांक करण सिंग टांक व शेकडो कार्यकर्ते त्यावेळी हजर होते आणि आजाद समाज पार्टीच्या आणि भीम आर्मी च्या वतीने पीडितांना पोलीस सौरक्षन आणि गावामध्ये पोलीस चौकीची मागणी करण्याकरिता गावामधील संबंधित पोलीस स्टेशन ला जाऊन तिथल्या ठाणेदार यांच्याशी मागणी केली व तात्काळ ती मागणी मान्य केली त्यासोबत R P I ( गवई गट) R P I (आठवले गट) वंचित बहुजन आघाडी,दलित पँथर असे संपूर्ण पक्ष व संघटना एकत्र येऊन पीडितांचे सांत्वन करण्यात आले