सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )
संगीत साखरे सारखे गोड असते माणसातली शुध्द शक्ती जागृत करण्यासाठी संगीत काम करते संगीतामध्ये रस आहेसंगीताच्या माध्यमातून नादब्रह्म आहे या व्दारे परमेश्वराशी नाते जोडता येते निरस वातावरणाला रसपूर्ण करण्याचे काम भारतीय संगीताने केले आहे. असे प्रतिपादन पलसिध्द महास्वामी मठाचे मठाधिपती ष ब्र सिध्दलींग शिवाचार्य महाराज यांनी व्यक्त केले.
साखरखेर्डा येथे पलसिध्द महास्वामी मठात आयोजित नादब्रह्म संगीत विद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच दाऊतसेठ कुरेशी तर प्रमुख पाहुणे म्हणून वेदमूर्ती निळकंठ स्वामी मानवतकर, हदगाव मठाचे सोमनाथ स्वामी, रावसाहेब देशपांडे, अनिकेत सैनिक स्कूलचे चेअरमन अर्जुनराव गवई, उपसरपंच प्रविण पाझडे, संतोष जयस्वाल, विश्वनाथ आप्पा जितकर उपस्थित होते.
यावेळी नादब्रह्म संगीत विद्यालयाचे अध्यक्ष संगीत विशारद प्रा अभय मासोदकर यांनी आपल्या प्रास्ताविकात असे सांगितले कि, नव्या पिढीने संगीत कला आत्मसात करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे, ग्रामीण भागात विठूनामाचा गजर घुमतो मात्र भारतीय संगीत कलाकारांची वाणवा असून भावी पिढीला संगिताचे बाळकडू पाजण्यासाठी साखरखेर्ड्याच्या पावन कुशीत नादब्रह्म विद्यालयाची मुहूर्तमेढ रोवत असल्याचे ते म्हणाले. यावेळी प्रा.डॉ. शाम दुतोंडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की,
भारतीय संगीत कलेला तारणारा एक तराणा आहे. महाराष्ट्राला या संगीताची अफाट अशी वैभवशाली परंपरा आहे, याच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये भारतीय संगीत कलेचा सिंहाचा वाटा आहे याच संगीताचा वारसा टिकवून ठेवण्याचं कार्य अनेक महान गायक, वादक, तथा संगीतकार करतात.
हिच परंपरा जपत “एक तरी अंगी असू दे कला नाहीतर काय फुका जन्मला” या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या उक्तीप्रमाणे सांगितीक यशाच्या प्रसन्न वळणावरचा आनंद अनुभवण्यासाठी येथे नादब्रह्म च्या माध्यमातून शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी तथा सर्व वयोगटातील रसिकांना शास्त्रीय, सुगम, संगीताचे धडे मिळणार आहे यानंतर वेदमूर्ती निळकंठ स्वामी मानवतकर, अर्जुनराव गवई यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश थोरहाते तर आभार प्रदर्शन संतोष गाडेकर यांनी केले. कार्यक्रमाला दीपक गवळी, गणेश खरात, चंचू बेंदाडे, शुभमसिंग ठाकूर, सुनील रिंढे, प्रफुल्ल जडे, बालनाथ कासार, डॉ प्रविण ठोसरे, अनिल कासार, विष्णू गायकवाड, डॉ संदिपकुमार सुरूशे, उमेश गंभीर उपस्थित होते.