सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )
सध्या महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन सुरू आहे काही ठिकाणी संचारबंदी सुद्धा सुरू आहे तर शनिवार आणि रविवार ला कडकडीत बंद आहे ‘शिवाय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा दहा ते पंधरा दिवस कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे .अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणसाची जिने अस्वस्थ करणारे आहे ‘
कारण अशी काही कामगार आहेत की जे कामाला गेल्यानंतर कमावलेल्या पैशातून अन्य धान्य आणून आपल्या घराचा प्रपंच भागवतात ‘
व कामाला गेले शिवाय आपली रात्रीची चूल पेटू शकत नाही अशी परिस्थिती सर्वसामान्य कामगार वर्गाची सध्या झालेली आहे ‘दहा ते बारा दिवस कामगार घरीही राहील ‘परंतु लॉकडाउनच्या काळामध्ये अनेक दुकानदार आपले हात धुऊन घेतात ‘
त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड वाढले आहेत .खाद्य तेलाचे भाव तर दीडशेच्या आसपास जाऊन पोहोचली आहे सध्या खाद्यतेलाचे भाव 140 ते 145/ रुपये दराने आहेत ‘साखरेचे भाव सुद्धा वाढलेले आहेत ।दवाखान्या मध्ये सुद्धा औषधी चे भाव वाढलेले आहे ‘
अशा परिस्थिती मध्ये जर खाद्य तेलाचे भाव साखरेचे भाव मिठाचे भाव मसाल्याचे भाव अव्वाच्या सव्वा दराने वाढत असतील तर सर्वसामान्य माणूस कसा काय जगू शकेल ।
सर्वसामान्य माणसाला जगायचं असेल तर आगोदर दुकानातील भाव कमी करावे अशी मागणी होत आहे .
अनेक दुकानदार लॉकडाऊन च्या काळामध्ये मालच नाही असे सांगून मनानेच किमती वाढवत आहे ‘यावर उत्पादन शुल्क विभागाने लक्ष देण्याची गरज आहे ‘
– (सध्या माझे दुकान गेल्या पाच दिवसापासून बंद आहे त्यामुळे उपासमारीची वेळ माझ्यावर येऊन ठेपली आहे ‘इकडून तिकडून अन्य धान्य घेऊन आम्ही जगू शकतो परंतु जीवनावश्यक वस्तूंचे भाव तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ह्या किमती शासनाने कमी कराव्या व खुशाल दहा ते पंधरा दिवस लॉक डावून करावे ‘ — ..विलास तोडे ( रेडियम व्यवसायिक )