Home वर्धा हिंगणघाट शहरात मोठ्या प्रमाणात रोगराईत वाढ होत आहे ? वीर भगतसिंग विद्यार्थी...

हिंगणघाट शहरात मोठ्या प्रमाणात रोगराईत वाढ होत आहे ? वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद कडून मुख्याधिकारी यांना निवेदन .

 

सचिन वाघे वर्धा

दि.1.7.21हिंगणघाट शहरामध्ये गेल्या एक महिन्यापासून डेंगू या विषाणू जन्य आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. सध्या पावसाळा सुरू आहे त्यामध्ये काही दिवस पडणाऱ्या पावसाने उघडीप घेतल्यामुळे जागोजागी साचून राहिलेल्या पाण्यात डेंगू चे विषाणू वाढतात. इडास जाती च्या डासांमुळे हा आजार पसरतो. डेंगू हा विषाणूजन्य आजार असून हा तीव्र फ्लू सारखा आजार आहे आणि या मध्ये मृत्यू ओढवण्याची शक्यता असते. त्यामुळे या आजारांवर वेळीच नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
त्याकरिता संपूर्ण शहरात नाली सफाई, धूर फवारणी व साचलेल्या पाण्याच्या डबक्यामध्ये आणि नाल्यामध्ये विषानुनाशक औषधी ची फवारणी करण्या संबंधी चे निवेदन देण्यात आले व उपाययोजना करण्या संबंधी चर्चा करण्यात आली. मा. मुख्याधिकारी साहेबांनी त्वरित निवेदनावर विचार करून पुढील कार्यवाही करिता पाठविले व लवकरच सुचवलेल्या उपाय योजनां करण्यात येईल याबद्दल आश्वासन दिले. यावेळी संघटनेचे विधानसभा अध्यक्ष अक्षय थूटे, तालुका अध्यक्ष दिनेश काटकर, तालुका सचिव गौरव गोहाडे, अभिजीत साबळे, रजत मोगरे, शुभम घोडे आदि पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.