6 डिसेंबरला रडणे 14 एप्रिल ला नाचणे म्हणजे बाबासाहेबांना मानवंदना नव्हे,विद्या राईकवार

0
653

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कारंजा घा. जि .वर्धा येथे त्रिरत्न बौद्ध महासंघ , बुद्धिष्ट एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशन , डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन समिती व शालवन बहुउद्देशीय संस्था कारंजा च्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन समारोह संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष धम्म मित्र एस. पी. गाडगे , प्रमुख मार्गदर्शक विद्या राईकवार सामाजिक कार्यकर्ता वर्धा तसेच प्रमुख पाहुणे ,कारंजा नागरी संघर्ष समितीचे सदस्य विनोद चापले आणि मोहन राईकवार, राजेंद्र इंगळे , तुलाराम गायकवाड , प्रमिला बोरकर आणि रामदास तायडे हे विचार मंचावर उपस्थित होते .
याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक विद्या राईकवार म्हणाल्या 6 डिसेंबरला रडणे आणि 14 एप्रिल ला नाचणे म्हणजे महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना नव्हे तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गानुसार समाज हितासाठी प्रत्येकाने कार्य केले पाहिजे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी केवळ दुखवटा न करता किंवा जयंतीदिनी जय-जयकार न करता त्यांचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न केला पाहिजे . हा या महापरिनिर्वाण दिनी संकल्प करणे म्हणजे खरी श्रद्धांजली ठरेल .अशाप्रकारे विद्या राईकवार यांनी श्रद्धांजलीपर उद्गार काढले .तसेच याप्रसंगी संगीता पाटील आणि त्यांचा संच यांनी अभिनय कलेतून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्म मित्र मंदा नागले यांनी केले. प्रास्ताविक डॉ. युवराज तायडे यांनी केले तर विजय कांबळे यांनी उपस्थितांचे ,पाहुण्यांचे तसेच श्रद्धेच्या भावनेतून कार्यक्रमासाठी आर्थिक मदत करणाऱ्या समाज बांधवांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयु.अशोक नागले, राजेश दहीवडे, गौतम गवई ,गजानन बोरकर , रमेश मनवर, नंदा गौरखेडे ,चंद्रशेखर येसनकर , संजय गाडगे ,निष्कर्ष नागले ,पियुष रेवतकर,उमेश पाचपोहर ,राजेंद्र इंगळे यांनी सहकार्य केले.🙏🏼

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here