निलेश पगारे नांदगाव तालुका प्रतिनिधी (नासिक )
नांदगाव मागील महीन्यात ढगफुटी सदृश्य पावसाने येथील लेंडी नदीला आलेल्या पुराने हतबल झालेल्या नगरपालीकेचे अतिक्रमण तर वाहुन गेलेच परंतु त्यामुळे स्थायिक व्यावसायिकांचेही अतोनात नुकसान झाले त्यात गावाला जोडणारा रेल्वे अंडरपासमध्ये साचलेले पाणी पंधरा दिवस उलटले तरीही रेल्वे अथवा नगरपालीका प्रशासन कोणाकडुनही काढले जात नाहीये.आम आदमी पक्षाचे तरुण नेते विशाल वडघुले स्वत:च्या जिवाची पर्वा न करता केवळ नांदगावकरांच्या भल्यासाठी तीन तास त्या अंडरपासच्या पाण्यात उभे राहीले तरी प्रशासनाचे डोळे उघडले नाहीये.स्थानिक नेते सुध्दा या विषयावर मोैन आहेत.
परंतु प्रशासनाच्या या अनागोंदी वागणुकीचा रहीवाशांना त्रास होतोये.सर्वसामान्य जनता शालेय विद्यार्थी तसेच हमालवाडा ,अानंदनगर ,चांडक प्लाँट , विवेकानंदनगर ,मल्हारवाडी या भागातील लोकांना आपला जीव धोक्यात घालुन रेल्वे क्राँसिंग करुन गावात जावे लागत आहे.
नांदगावकर त्रस्त प्रशासन सुस्त अशी नांदगावकरांची परिस्थिती झाली आहे.अधिकारी येतात मंत्री येतात पाहणी करतात आश्वासने देतात आणि परत निघुन जातात परंतु परिस्थिती काही बदलत नाहीये.







