निलेश पगारे नांदगाव तालुका प्रतिनिधी
खा.संजय राऊतांचा नांदगाव दौरा भुजबळांवर केलेल्या टिकेने चांगलाच चर्चेत आला आहे.जनतेच्या प्रश्नासाठी सदैव तत्पर असणारे जनसेवक आमदार म्हणुन सुपरिचीत सुहास अण्णा कांदे यांनी अतिवृष्टी व पुरग्रस्त नागरिक व शेतक-यांसाठी अनुदानावरुन भुजबळ साहेबांवर आक्रमक पवित्रा घेऊन दोघांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली होती.त्यानंतर सुहास कांदेंनी अनेक आरोप केले होते या गोष्टींवर खा.संजय राऊत पडदा टाकतील व नांदगावच्या जनतेच्या प्रश्नांवर समस्येवर बोलतील असे जनतेला अपेक्षा होती परंतु संजय राऊतांनी त्या वादाला आग देऊन भुजबळांनी नांदगावचा नाद सोडावा,शिवसेनेच्या कृपेनेच भुजबळ साहेब राजकारणात अाहेत.आज लाल दिव्याची गाडी नाशकात आहे उद्या ती नांदगावात राहील असे सांगुन संजय राऊतांनी भविष्यात वेळ आली तर सुहास कांदेंना मंत्रीपद देऊ असे आश्वासीत केले.शिवसैनिकांनी नांदगावात भगवा फडकवला आहे तो आता पडु देणार नाही असे सांगीतले पण ज्यांना स्वत:ला कधी मंत्रीपद मिळाले नाही ते अण्णांना मंत्रीपद देण्यास सफल होतील का हे तर वेळच सांगेल अभी तो दिल्ली दुर है.मागील एक वर्षाच्या कालावधीत सुहास अण्णा कांदे यांनी केलेले कार्य वाखाणण्या जोगे आहे पुढील कालावधीत जनतेच्या अडचणींसाठी कितपत कार्य करतील हे तर दिसेलच पंकज भुजबळांनी त्याच्या कार्यकालात केलेली कामेही विसरुन चालणार नाही.पालकमंत्री भुजबळांना विरोध टिका करुन नांदगाव मतदारसंघाचा गड सांभाळण्यास शिवसेनेला पुढिल चार वर्षात कितपत यश मिळते यावर पुढील पंचवार्षिक अवलंबुन आहे.पालकमंत्री म्हणुन छगन भुजबळ जनतेच्या मनात टिकुन राहतात की जनसेवक म्हणुन सुहास अण्णा कांदे राज्य करतात याचे चित्र आता पुढिल पाच वर्षात स्पष्ट होईलच परंतु या काळात जनतेचे प्रश्न मार्गी लागावे हीच सदीच्छा.