नदीवरील पुलास कठडे नसल्याने बैलगाडीचा बैल नदीत कोसळून जखमी.( river bridge )

0
2

 

[ शेतकऱ्याचे 50 ते 60 हजाराचे नुकसान]

[ सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष. नुकसान भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा]

संग्रामपूर (रामेश्वर गायकी)

river bridge:संग्रामपूर तालुक्यातील काथरगाव येथील पांडव नदीच्या पुलावर कठडे नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे बैलगाडीचा बैल नदीत कोसळून गंभीर जखमी झाल्याची घटना.

आज दि. 18 /मे रोजी सकाळी घडली आहे. यात शेतकऱ्याचे 50 ते 60 हजाराचे नुकसान झाले असून बैलगाडी अडकल्याने चार जणांचे प्राण वाचले आहेत.

हिंगणा वैजनाथ तालुका शेगाव येथील घटना जागेच्या वादावरून जीवाणी मारण्याची धमकी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( brekingnews )

याबाबत प्राप्त माहिती अशी की आज दि .18 /मे रोजी संग्रामपूर तालुक्यातील वरवट (बकाल )येथे गुरांचा आठवडी बाजार असल्याने काकोडा येथील राजू कौळकार व त्यांचे 3 सहकारी हे बैल खरेदी विक्रीसाठी जात असतांना काथरगाव जवळील पांडव नदीच्या पुलावर कठडे नसल्याने बैलगाडीचा बैल नदीत कोसळून जखमी झाला.

तर चार जण व मागे बांधलेले बैल बचावले. सदर घटना ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे घडली आहे, शेतकऱ्यास नुकसान भरपाई द्यावी. अशी ग्रामस्थ व सरपंच यांच्याकडून मागणी होत आहे.

दि. 22 /जून 2023 रोजी झालेल्या महापुरामुळे काथरगाव नदीच्या पुलावरील कठड्याचे नुकसान झाल्याने सार्व. बांधकाम विभागाने ते काढून नेले.

त्यानंतर ग्रामपंचायतचे लोक नियुक्त सरपंच सुवर्णा गणेश टापरे यांनी वारंवार पत्रव्यवहार करून व फोन द्वारे कठडे बसविण्याची मागणी करूनही अद्याप कठडे बसवली नाहीत.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यामुळेच नुकसान झाले आहे.ह्यापूर्वी ही दुचाकी,चारचाकी वाहन प्रवाश्यांचे किरकोळ घटना घडल्या आहेत.

river bridge:तरी शेतकऱ्यांस नुकसान भरपाई द्यावी तसेच नुकसान भरपाई न मिळाल्यास महाराष्ट्र प्रदेश किंवा काँग्रेसचे सचिव गणेश टापरे यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here