Home जळगाव Grampanchayat/ग्रामसेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर; ग्रामसभेच्या सचिवपदाच्या कामकाजावर बहिष्काराचा निर्णय

Grampanchayat/ग्रामसेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर; ग्रामसभेच्या सचिवपदाच्या कामकाजावर बहिष्काराचा निर्णय

0
7

 

गटविकास अधिकारी व तहसीलदारांना निवेदन; यावल तालुक्यात ग्रामसभांसाठी अन्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्याची मागणी

यावल (प्रतिनिधी : विकी वानखडे)

– ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत ग्रामसेवक व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, पारोळा तालुक्यातील शिवरे ग्रामपंचायतीतील ग्रामपंचायत अधिकारी ए.एन. पाटील यांच्या मृत्यूच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या यावल तालुका शाखेने आक्रमक भूमिका घेतली आहे. ग्रामसेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत ग्रामसभेच्या सचिवपदाच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

यासंदर्भात यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच तहसीलदार यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. ग्रामसभांचे कामकाज सुरळीत राहावे, यासाठी ग्रामसेवकांऐवजी अन्य विभागातील अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांची ग्रामसभा सचिव म्हणून नियुक्ती करावी, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

संघटनेच्या निवेदनानुसार, पारोळा तालुक्यातील मौजे शिवरे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेदरम्यान ग्रामपंचायत अधिकारी ए.एन. पाटील यांच्या घरात झालेल्या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत धक्कादायक असून, या घटनेचा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे.yavalnews

ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामसेवक हे गावपातळीवर शासनाच्या विविध योजना, ग्रामसभा, विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी पार पाडत असतात. मात्र, कामकाज करताना त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.

१८ ऑगस्टपासून अनिश्चित काळासाठी बहिष्कार

निवेदनात नमूद केल्यानुसार, दि. १८ ऑगस्ट २०२६ पासून पुढे अनिश्चित कालावधीकरिता ग्रामसभा घेण्याच्या कामकाजात ग्रामपंचायत सचिव म्हणून ग्रामसेवक उपस्थित राहणार नाहीत. ग्रामसभेच्या सचिवपदाच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये आयोजित होणाऱ्या आगामी ग्रामसभांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामसभांचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.yavalnews

अन्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी

यावल तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये होणाऱ्या ग्रामसभांसाठी ग्रामपंचायत अधिकारी अथवा ग्रामसेवकांऐवजी अन्य विभागातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत संबंधित विभागांना तातडीने योग्य त्या सूचना देण्यात याव्यात, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामसेवक संघटना प्रशासनास सहकार्य करण्यास सदैव तयार आहे. मात्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असल्याने त्यांच्या मागण्यांवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.

प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

Garampanchayat/ग्रामसेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न, ग्रामसभांचे कामकाज आणि पर्यायी सचिवांची नियुक्ती याबाबत आता गटविकास अधिकारी व तहसीलदार प्रशासन कोणती भूमिका घेतात, याकडे यावल तालुक्यातील ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. संघटनेच्या निर्णयामुळे आगामी ग्रामसभांचे कामकाज कोणत्या पद्धतीने पार पडणार, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here