[ शहरी विभागासाठी सुविधा ग्रामीण भाग दुर्लक्षित.]
संग्रामपूर (सूर्या मराठी न्यूज ब्युरो )ः- महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेला आधुनिकतेची सुवर्ण किनार लाभली, तो क्षण आज विधानभवन प्रांगणात साकारला. ढोल-ताशांच्या गजरात, लेझीमच्या लयबद्ध तालावर आणि उत्साहाच्या उधाणलेल्या लाटांमध्ये ‘राजमाता जिजाऊ’ या अत्याधुनिक स्मार्ट बस सेवेचे भव्य लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडले. जणू इतिहास आणि वर्तमानाचा संगम घडवत या सोहळ्याने सार्वजनिक परिवहनाच्या नव्या युगाची पहाट उजळवली.
या दिमाखदार सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांसह विधीमंडळ सदस्य, वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने या ऐतिहासिक क्षणाची शोभा अधिकच खुलली.

St‘राजमाता जिजाऊ’ हे नाव उच्चारताच मातृत्व, संस्कार आणि स्वराज्याची प्रेरणा मनात जागृत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेच्या माध्यमातून केवळ प्रवास नव्हे, तर इतिहासाची प्रेरणादायी परंपरा प्रत्येक प्रवाशाच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.busnews
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशा सुमारे तीन हजार बसचा ताफा टप्प्याटप्प्याने राज्यभर धावणार असून, सुरक्षितता, आराम आणि विश्वास यांचे त्रिवेणी संगम प्रवाशांना अनुभवता येणार आहे. ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘शिवाई’, ‘हिरकणी’ आणि ‘यशवंती’ या गौरवशाली सेवांच्या परंपरेत ‘राजमाता जिजाऊ’ ही आणखी एक तेजस्वी कडी ठरणार आहे. पूजन, फीत कापून झालेल्या शुभारंभानंतर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि परिवहन मंत्री सरनाईक यांनी या बसमधून प्रवास करत नव्या युगाची सुरुवात प्रत्यक्ष अनुभवली. बसच्या अग्रभागी घोड्यावर आरूढ झालेल्या राजमाता जिजाऊंचा देखावा जणू इतिहासाला सजीव करत होता—त्या दृश्याने संपूर्ण सोहळ्याला एक अद्भुत, प्रेरणादायी आणि आयाम प्राप्त झाला.
[ ग्रामीण भागातील अश्या एस टी बस आगारामध्ये बस केव्हा येणार ? फक्त शहरी विभागासाठीच सर्व सुविधा असतात.मात्र ग्रामीण खेडेविभागात आमचे बुलडाडाणा जिल्ह्यातील जळगाव (जामोद), शेगाव ,खामगाव,बसआगाराला पाहिजे त्या नवीन बस पहावयास मिळत नाही.आशी खंत ग्रामीण भागातील प्रवाश्यांनी केली आहे.
Devendrafadnsvis /नेहमी भांगार व रस्त्यावर बंद पडणाऱ्या बासेस मिळतात.ही शोकांतिका आहे.
रामेश्वर गायकी सह अनेक सामाजिक कार्यकर्ते. संग्रामपूर तालुका]








