Hingnghatnews /“रेती माफियांना अभय कोणाचे?” — नदीपात्र लुटले जात असताना प्रशासन गप्प का?

0
92

 

हिंगणघाट/समुद्रपूर : प्रतिनिधी सचिन वाघे

Tahsilnews /तालुक्यातील लिलाव न झालेल्या नदी घाटांमधून सुरू असलेल्या कथित अवैध रेती उत्खननाने आता गंभीर वळण घेतले आहे. दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या अंधारात नदीपात्रातून रेती उपसली जाते, डंपर-ट्रॅक्टर रस्त्यांवरून सर्रास फिरतात; तरीही कारवाई मात्र शून्य. प्रश्न उपस्थित होतो — या सगळ्याला अभय कोणाचे?

स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, निष्पक्ष चौकशी झाली तर पुरावे आपोआप समोर येतील. रेती चोरी करणाऱ्या मुख्य सूत्रधारांमध्ये प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग असल्याची चर्चा रंगली आहे. काही वाहनांवर नंबर प्लेट नसणे, तर काहींचे कागद दुसऱ्याच नावावर असणे, हे प्रकार उघडपणे सुरू असल्याचा आरोप आहे.
यामुळे वाहतूक यंत्रणा, परवाना प्रक्रिया आणि तपासणी प्रणालीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

वन विभाग, पोलीस प्रशासन, महसूल यंत्रणा तसेच RTO विभागातील काही संबंधितांवर कथित “हप्ते” सुरू असल्याची चर्चा परिसरात होत आहे.
पर्यावरणीय दृष्टीने पाहता, अनियंत्रित उत्खननामुळे नदीपात्राची खोली वाढते, काठांची धूप होते, भूजल पातळी घटते आणि भविष्यात पूरस्थितीचा धोका वाढतो.

Wardhanews /नदी ही फक्त रेतीचा साठा नसून संपूर्ण परिसंस्थेचा आधार आहे — हे प्रशासन विसरले आहे का? नागरिकांचा सवाल स्पष्ट आहे —
लिलाव नसताना उत्खनन कसे?
नंबर प्लेट नसलेली वाहने रस्त्यावर कशी?
संबंधित विभाग कारवाई का करत नाहीत?

जर सर्व काही कायदेशीर असेल तर प्रशासनाने तातडीने अधिकृत आकडेवारी जाहीर करावी. अन्यथा स्वतंत्र विशेष तपास पथक (SIT) नेमून संपूर्ण साखळीची चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Hingnghatnews /नदी लुटली जात असताना यंत्रणा मौन बाळगणार का, की आता तरी कठोर कारवाई होणार? जनतेच्या नजरा प्रशासनाकडे लागल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here