अनिलसिंग चव्हाण ( मुख्य संपादक )
revenuenews/महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी भीष्णूर घाटात यांची पाहणी घरकुल धारकांसाठी राखीव असलेल्या भीष्णूर व नवाबपूर वाळू (रेती) घाटातून मशीनद्वारे रात्री व दिवसा होत.
असलेले अवैध उत्खनन तात्काळ थांबविण्याबाबात आष्टी तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थी घरकुल धारक यांना मोफत रेती उपलब्ध करून देण्याबाबत शासन निर्णय अस्तित्वात आहे. त्यानुसार आपण आपल्या स्तरावरून भीष्णूर व नवाबपूर या वाळू घाट घरकुल धारकांसाठी विशेषतः राखीव ठेवून रेती नेण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत.
परंतु दुर्दैवाने या दोन्ही घाटांमध्ये अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यापूर्वीच चोरट्यांनी (तस्करांनी) मुबलक प्रमाणात रेती चोरून नेल्याने घाटात कोरड्या जमिनीत फक्त खडांगा रेतीमधील मोठे दगड उरलेले आहेत. तरीही सध्या पोकलॅंड मशीन, डोंगे इत्यादी यंत्रसामग्रीद्वारे रात्री व दिवसा मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन व चोरी सुरू आहे.
यामुळे घरकुल धारकांना आवश्यक रेती उपलब्ध होत नाही.आम्ही यापूर्वीही आपणास तोंडी माहिती दिलेली आहे. तालुक्यातील घरकुल धारकांना व्यवस्थित रेती उपलब्ध व्हावी यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न आहे.
परंतु रेती तस्करांमुळे घरकुल धारकांना तसेच त्यांच्यासाठी रेती वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हे अवैध उत्खनन पर्यावरणाला हानी पोहोचवत असून, शासनाच्या घरकुल योजनेच्या उद्देशाला धक्का लावत आहे.
तरी आपण या गंभीर विषयाकडे विशेष गांभीर्याने लक्ष देऊन खालील मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात, ही विनंती: भीष्णूर व नवाबपूर वाळू घाटात होणारे सर्व अवैध उत्खनन मशीनद्वारे रात्री-दिवसा तात्काळ थांबवावे.
रेती तस्करांवर कठोर कारवाई करावी जप्ती, दंड, गुन्हे दाखल करणे घरकुल धारकांसाठी राखीव घाट सुरक्षित ठेवून रेती उपलब्धतेची व्यवस्था करावी.
आवश्यकतेनुसार पाहणी करून अहवाल तयार करावा व आम्हाला लेखी उत्तर द्यावे.

आपल्या त्वरित कारवाईमुळे घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत रेती मिळेल आणि शासनाच्या योजनेची अंमलबजावणी प्रभावी होईल, असा आम्हाला विश्वास आहे.revenuenews
revenuenews/तहसीलदार मॅडम यांना वारंवार लेखी मौखिक माहिती दिल्यानंतर सुद्धा लक्ष केंद्रित का करत नाही. या मध्ये काय साठ गाठ आहे हें समस्त गावकरी ग्रामस्थ विचार करत आहे.महसूल कर्मचारी जेव्हा येतात याची माहिती या लोकांना मिळते तरी कशी?








