Sangrampur Chana Damage : शेकडो एकरातील हरभऱ्यावर शेतकऱ्यांनी फिरवला ट्रॅक्टर
अनिलसिंग चव्हाण ( मुख्य संपादक) 8975551991
गेल्या काही महिन्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने या संग्रामपूर तालुक्यात कपाशी, तूर, हरभरा, गहू या रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले असून संग्रामपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी रब्बीत लागवड केलेल्या हरभरा पिकावर ट्रॅक्टर शेतकऱ्यांनी फिरवल्याचे विदारक चित्र दिसत आहे.
या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे.
साधारणतः या दिवाळीच्या मुहूर्तावर रब्बीचा हंगाम सुरू झाला होता. परंतु या सोयाबीन तयार झाल्यावर शेतकऱ्यांनी गहू, हरभरा या रब्बी पिकांच्या लागवडीची तयारी सुरू केली होती. पंरंतु मागील गेल्या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात सतत पावसाने या संग्राम पूर तालुक्यात धुमाकूळ घातला होतं.
https://www.suryamarathinews.com/sangtiraobhongal/
त्यामुळे या कापूस, तूर, या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झालेअसून. शेतकऱ्याचे हजारो क्विंटल कापूस शेतात भिजला. व व्यापारी या भिजलेल्या कापसाला अत्यंत कमी भावात खरेदी करीत आहेत. परंतु तूर पिकाचे पण नुकसान झाले. तुरीच्या शेंगा गळून पडल्या होतं. परंतु शेतात आता केवळ तुराट्या उभ्या आहेत. म्हणुन पावसाची संक्रांत आल्याने शेतकरी पार उद्ध्वस्त झाला आहे.
पावसानंतर ओलाव्यामुळे मर रोगाचे खूप मोठ्या प्रमाण वाढले. संग्रामपूर तालुक्यात शेकडो शेतकऱ्यांनी हरभरा पिकावर रोटाव्हेटर फिरविले आहे.Sangrampur Chana Damage
संग्रामपूर येथील तीन एकरात हरभरा पेरणी केली होती. परंतु या पावसामुळे हरभरा पिकावर मर रोगाचे आक्रमण झाल्याने अंकुरलेल्या हरभरा रोपावर किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे त्यामुळे हरभरा पिकावर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर फिरवण्याशिवाय पर्याय उरलं नव्हता.
परंतु या दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.- श्रीकृष्ण राऊत, तामगाव, जि. बुलडाणा
अमोल बनसोड, तालुका कृषी अधिकारी, संग्रामपूर दुबार पेरणी करायची झाल्यास शेतकऱ्यांना १५ जानेवारीपर्यंत ज्वारीचे पीक घेता येईल. व सोयाबीन, तीळ, जवस आदी पिके पण घेता येतील. परंतु यासाठी ओलिताची सोय असणे खूप गरजेचे आवश्यक आहे. मात्र या २० डिसेंबरपर्यंत उशिरा येणाऱ्या हरभरा वाणाची पेरणीसाठी निवड करता येईल. पण बीजप्रक्रिया करून पेरणी करावी. असे आव्हान कृषी अधिकारी अमोल बनसोड यांनी दिली..Sangrampur Chana Damage