प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, व सामाजिक संघटना कडून शहरातील विविध समस्यासाठी नगर परिषदेवर धडक आंदोलन करण्यात आले.
हिंगणघाट शहरातील १४२ कोटी रुपयांच्या अमृत योजने अंतर्गत मल निसारण भुयारी गटार योजना व पाणी पुरवठा योजनेचे कामे झाली असून व नंतर ५० कोटीचे वाढीव कामे करण्यात आली अमृत योजना फेस १ चे काम संतोष कॅन्स्टशन कंपनी नांदेड यांना ६१ कोटी ची कामे दिली व २०१७ झाली या कामाला सुरुवात झाली.
फेस २ चे काम गुजरात येथील कंपनीला ५० कोटीची कामे दिली व ती सुरू आहे. व सन २०१८ साली मल निस्सारन योजना ८१ कोटीचे काम लक्ष्मी कॅन्स्टशन गुजरात यांना देण्यात आली. व ते कंपनीने काम सन २०२२ साली पूर्णता करून गेली. परंतु आजही हि कामे शहरात पूर्ण झालेली नाही. शहरात मल निसारण योजने अंतर्गत रस्ते खोदकाम केले असून रस्त्याचे कामे अजूनही अपूर्ण आहे.
तसेच रोड वरील चेंबर बनविण्यात आले त्या चेंबर चे झाकन पूर्ण पणे तुटलेल्या स्थितीत आढळून येत आहे. तसेच शहरातील काही प्रभागात नळाचे काम झाले आहे. तर काही प्रभागातअजून हि कामे झालेले नाही असे आढळून येत आहे. तर कुठे झालेल्या कामात नळाला तोट्या देखील लागल्या गेल्या नाही. एकंदरीत या झालेल्या कामात मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार झाला आहे असे दिसून येत आहे.
या झालेल्या कामाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व संबंधित कंत्राकदारावर कारवाई करण्यात यावी.
तसेच शहरातील सन २००८ साली वना नदीच्या पात्रात ५ कोटी ३४ लाख रुपयांचा बंधारा बांधण्यात आला. व सन 2011 साली तो बंधारा पाण्यात वाहून गेला या कामात संबंधित कंत्राटदार यास प्रगती पुस्तके प्रमाणे रक्कम देण्यात आली होती. व त्या वेळेला अधिकारी व राजकीय पुढारी यांच्या हस्तशेप असल्यामुळे या बंधाराच्या कामात मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार करण्यात आला.
तसेच या बंधाऱ्यासाठी आलेली शासकीय निधी प्रशासनानी कोणत्या बँकेत ठेवली होती यांची सदर माहिती देण्यात यावी. तसेच संपूर्ण काम झाल्याची ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते का? आणि एकाच कामाला दोन वेळा निधी मंजूर होत असतो का ? यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असे दिसून येत आहे. यामुळे या बंधाऱ्याची चौकशी करून त्यावेळेसचे संबंधीत अधिकारी व राजकीय पुढारी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसेच नवीन बंधारा ५९ करोड रुपयाचा आहे तर त्यांचे स्वागतच आहे.
परंतु नवीन बंधाराचे काम निकृष्ट दर्जाचा न होता चांगल्या दर्जाचे व्हावे. याकरिता निरीक्षणासाठी वेगळी समिति नेमून त्या कामावर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे. जर हा बंधारा निकृष्ट दर्जाचा बनविण्यात आला व त्यात परत भष्ट्राचार झाला तर आम्ही शासन / प्रशासनाला जबाबदार ठरवु. तसेच नवीन बंधाऱ्याच्या कामात कुठलाही भ्रष्टाचार होऊ न देता या बंधाऱ्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे करण्यात यावे.
तहसील कार्यालय ते रुबा चौक दरम्यान १८ कोटी ७० लाख रुपये निधी देऊन ९०० मिटर चा रस्ता निर्माण केला जात आहे. हा रस्ता शासनाच्या कोणत्या निकषाप्रमाणे निर्माण करण्यात येत आहे, त्यांचे विवरण आम्हाला द्यावे. १८ कोटी रुपये हा जनतेचा पैसा असून या कामांत भष्ट्राचार होत असेल तर या रस्त्याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी. बस स्टॉप समोरील ट्रॅव्हल्स पॉईंट पासून ते झांसी राणी चौक पर्यंत संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे.
हा रस्ता रहदारीचा असून या रस्त्यावर बस स्टॉप, महाविद्यालय, शासकिय कार्यालये आहे.पावसाळ्याचे दिवस असल्याने या रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याकरिता आपण या विषयाला गांभीर्याने घेऊन या रस्त्याच्या खड्याच्या प्रश्न मार्गी लावावा.मनसे चौक ते डांगरी वार्ड पूला पर्यंत रस्त्याचे काम मागील दोन वर्षापासून संथ गतीने सुरू झाले आहे. परंतु आज पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. या रस्त्यावर मुख्य आठवडी बाजार भरत असतो. तसेच रस्त्याच्या मधोमध्ये दुभाजक अजून पर्यंत उभारलेले नाही. या रस्त्यामुळे नागरिकाना नाहक त्रास सहन कराया लागत आहे. त्याकरिता आपण या विषयाला गांभीर्याने घेऊन या प्रश्न तात्काळ मार्गी लावावा.शहरातील डांगरी वार्ड येथील समर्थ रामदास आखाडा पासून ते लौटन चौक पर्यंत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन एक वर्ष अगोदर करण्यात आले परंतु आज पर्यंत या रस्त्याचे काम अध्यापही झालेले नाही. करीता या रस्त्याच्या कामा कडे जातीने लक्ष घालून या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे.
सर्व विषयाला गांभीर्याने घेऊन वरील सर्व प्रश्न तात्काळ मार्गी लावावे अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तीव्र ठोस भूमिका घेईल नंतर जे काही पडसाद उमटेल त्याचे सर्वस्वी जबाबदार शासन, प्रशासन राहील असे निवेदन प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी मुख्याधिकारी मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
Sharadpawar/यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, शहर निरीक्षक महेश झोटिंग पाटील,हाजी मोहम्मद रफिकभाई, तालुका अध्यक्ष विनोद वानखेडे,जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, शहराध्यक्ष बालू वानखेडे,समाजसेवक सुनील डोंगरे,माजी नगरसेवक अशोक पराते, शहर कार्याध्यक्ष अमोल बोरकर,दिव्यांग सेल प्रदेश सचिव मारोती महाकाळकर, कृषी सेल जिल्हाध्यक्ष प्रभाकर रेवतकर, युवक प्रदेश सचिव प्रशांत लोणकर,वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव,जिल्हामहासचिव मिलिंद कोपुलवार, महिला तालुका अध्यक्ष कविता वानखेडे,अंकिता गहलोत, गोमाजी मोरे,श्रीकांत भगत,राजेश भाईमारे,विजय तामगाडगे,सुधाकर वाढई, नितीन भुते,साहेबराव येडे,जगदीश वांदिले, नाना पुंड, रवी गिरसावले,उमेश नेवारे,सुनिल घोडखांदे,रमेश चतुर,प्रवीण भुते,अनिल लांबट, कुणाल येसबरे, प्रशांत एकोणकर,सुशील घोडे,विपुल थुल, हुकेश ढोकपांडे,देवा गवई, किशोर गायकवाड,पंकज भट्ट,राजू मुडे, आकाश हुरले,अन्सार शेख, पप्पू आष्टीकर,दिपक अंबरवेले,शेखर निखाडे, घिमेकर गुरुजी, मोहम्मद शाहिद,अनिल भुते,राहुल जाधव,वैभव साठोने, प्रशांत मेश्राम,छोटू वानखेडे,संजोक टेभोंर्ने, निखिल शेळके, रवी बोरकर,सौरभ घोडखांदे,सचिन घोडे, विपुल वाढई,रोहीत लेदे,मंगेश सातघरे,नंदू वाघमारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.