Umrganews /भूकंपग्रस्त भागातील योजनेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष “-सुनिता पावशेरे.

0
66

सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे

उमरगा : उमरगा आणि लोहारा या भूकंपग्रस्त तालुक्यातील १६ गावांना जल जीवन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळून तीन वर्षे होवून गेली. या योजनेचे कामही पूर्ण झाले असताना अद्यापही पाणीपुरवठा सुरू होत नसल्याने राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा तथा कलदेव निंबाळच्या उपसरपंच सुनीता पावशेरे यांनी जिल्हाधिकारी किरण कुमार पुजार यांना या संदर्भात ग्रामसभा ठरावासह (या.२४ )निवेदन देवून चर्चा केली.dharashivnews

व ही महत्वपूर्ण योजना त्वरीत चालू करण्याची यावेळी मागणी केली.
या महत्वाच्या योजनेअंतर्गत कलदेव निंबाळा गावासह बलसूर एकूरगा,पेठसांगवी जवळगा बेट, नारंगवाडी ,माडज, नाईचाकूर आदी उमरगा तालुक्यातील गावांचा समावेश आहे .तर लोहारा तालुक्यातील माकणी, सास्तुर, होळी, तावशीगड, सालेगाव, जेवळी, दक्षिण जेवळी आदी गावाचा समावेश आहे.शासनाने १२५ कोटी पेक्षा जास्त निधी यावर खर्च करुनही केवळ महावितरणाच्या जुनी थकबाकीचे कारण देत याकडे अत्यंत दुर्लक्ष केले जात आहे.

मागील महावितरणची थकबाकी शासनाने माफ करावी.स्थानिक आमदार व पालक मंत्री यांनी याबाबत जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी, जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता, महावितरण मुख्य अभियंता यांच्यासह त्वरित बैठक घेऊन ठोस निर्णय घ्यावा .धरण उशाला अन् कोरड घशाला अशी अवस्था भूकंपग्रस्तांची झाली आहे.त्यामुळे ही पाणी पुरवठा योजना त्वरित सुरू करावीत असे दोन्ही तालुक्यांतील सामान्य नागरिक बोलत आहेत. पावसाळा संपल्याने पाणी टंचाई जाणवण्या अगोदरच याचे नियोजन होणे आवश्यक आहे.

Umrganews /याबाबतीत अनेक वेळा भेटी घेवून, चर्चा ,ठरावास निवेदन दिले होते.आता योजना लवकर चालू नाही केल्यास दोन्ही तालुक्यांतील महिला,सामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी उपोषण करावे लागेल असा ईशाराही सुनिता पावशेरे यांनी निवेदनात दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here