नांदुरा:-(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-
मौजे मुरंबा येथुन महाळुंगी कडे जाण्याचा गाढ रस्ता हा संबंधित शेतकरी यांनी दगड रचुन अतिक्रमित केला आहे. त्यामुळे सदर रस्ता हा बैल गाडी, बैल जोडी जाईल एवढा सुद्धा राहिलेला नाही, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्यामध्ये मधोमध झाडं सुद्धा वाढलेले आहेत. त्यापैकी एक झाडा लिंबाचे तर दुसरे बाभळीचे आहे, हेसुद्धा रस्त्यातून काढणे आवश्यक आहे. अशीही शेतकऱ्यांची मागणी आहे.
पेरणी पाण्याचे दिवस लक्षात घेता आज रोजी मशागत करण्यासाठी व पेरणी करण्यासाठी ट्रॅक्टर, बैल जोडी शेतामध्ये जाणे आवश्यक आहे. त्यासाठी रस्ता मोकळा करणे अत्यावश्यक आहे. सदर विषय हा गंभीर रित्या घेऊन अधिकाऱ्यांमार्फत सदर रस्त्याचा पंचनामा करण्यात यावा व ज्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे, त्यांना रीतसर नोटिसा पाठवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, आणि आम्हा शेतकऱ्यांचा हक्काचा रस्ता मोकळा करण्यात यावा.
सदर रस्ता हा लवकरात लवकर मोकळा करून देण्यात यावा अन्यथा सर्व शेतकरी लोकशाही मार्गाचा अवलंब करून दि.९ /६ /२०२१ पासुन आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशाराही शेतकऱ्यांनी यावेळी दिला.
शेतकऱ्यांनी संबंधित आशयाचे निवेदन मा. आमदार साहेब, मा. जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा, विभागीय अधिकारी साहेब मलकापूर, मा. गटविकास अधिकारी साहेब नांदुरा, पोलीस ठाणेदार पिंपळगाव राजा यांना दिले आहे.
तरी शेत रस्ता लवकरात लवकर मोकळा करून आम्हाला न्याय मिळावा अशी रास्त अपेक्षा शेतकर्यांना आहे.