आर्वी तालुका प्रतिनिधी:- प्रज्वल यावले
न. प. ला प्राप्त झालेला निधी वितरित करण्याचे तात्काळ निर्देश द्या
जनता नगर येथील सार्वजनिक वैष्णवी गार्डन येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर छत्री व – हायमास्ट -खेडने सौंदर्य करण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्या
नगरविकास-तथा ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे कडे दिलीप पोटफोडे यांची मागणी
वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेते अभिजित फाळके पाटील यांच्या पुढाकाराने मुंबई च्या मंत्रालयात बैठक
आर्वी : नुकतीच वर्धा जिल्ह्यातील आर्वी नगर परिषद अंतर्गत झालेले प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मागील दोन वर्षांपूर्वीपासून 1476 लाभार्थी यांचे रखडलेले अनुदान तात्काळ मिळण्यासाठी दिनांक 07/07/2021 ला मुंबई येथील मंत्रालयात नगरविकास -तथा ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या दालनात वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नेते अभिजित दादा फाळके पाटील यांच्या पुढाकारात युवा स्वाभिमान पार्टी चे विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे-शहर अध्यक्ष कमलेश चिंधेकर आर्वी शहरातील -व विभागातील विविध समस्या- विषय घेऊन धडकले यात प्रामुख्याने आर्वी शहरात 2018- 2019 ला 1476 DPR 1-आणि DPR -2 मध्ये घरकुल मंजूर झालेत आणि नागरिकांनी काम सुरु केलेत आर्वी शहरातील पात्र लाभार्थी नागरिकांनी रीतसर प्रक्रिया करून प्रधानमंत्री आवास योजनेतून लाभ घेतला आणि घर बांधण सुरु केले काही पात्र लाभार्थ्याना एक टप्पा कोणाला दोन तर कोणाला तीन टप्पे मिळाले परंतु कोरोना 2019 मध्ये कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव वाढला केंद्र आणि राज्य सरकार अडचणीत आले कोणाच काम लेन्टर पर्यत तर कोणाची स्लॅप हाईट तर काहींचा जोता च पूर्ण झाला आणि पूर्ण दोन वर्ष अतोनात अडचणीचा सामना करत नागरिकांनी काढले परंतु आता लोकांची स्थिती फारच नाजूक झाली आहे भाड्याने राहणारे नागरिक भाडे न भरू न शकल्याने आता ताळपत्री टाकून राहत आहे तर काही आता ही भाड्या चा भुर्दंड सोसत आहे अशात एक आशेचा किरण दिसला कि न. प. ला 4 कोटी आलेत वितरण होईल याची वाट पहिली परंतु वितरण झाले नाहीत पुन्हा 8 कोटी आले परंतु वितरण झाले नाही अशात नागरिक मोठया अडचणीत आले आहे तरी तातडीने आलेल्या रकमेचा योग्य नियोजन करून तात्काळ पात्र लाभार्थी नागरिकांना उपलब्ध असलेली निधी वितरण करावा तसेच राज्य व केंद्र सरकार कडे बाकाया उर्वरित निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी बैठकीत करण्यात आली तसेच
जनता नगर परिसरातील AMPS कॉन्व्हेंट लगत असलेल्या सार्वजनिक वैष्णवी गार्डन मध्ये महाराष्ट्र राज्याचे सर्व धर्माचे प्रेरक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णकृती पुतळा आहे परंतु त्यावर छत्री नसल्याने महाराजांच्या पुतळ्यावर ऊन वारा पाऊस याचा सरळ आघात होतो करिता महाराजांच्या पुतळ्यावर छत्री व्हावी परिसरातील महिला करिता सकाळ सायंकाळी फिरण्यासाठी वॉकिंग ट्रॅक व्हावा लहान मुलांना खेडने उपलब्ध व्हावे महिला पुरुषां साठी व्यायाम साहित्य तसेंच याच उद्यानात नवरात्री उत्सव मोठया उत्सवात साजरा केला जातो तरी हायमास्ट असणे गरजेचे आहे या सर्व महत्वपूर्ण मागण्या प्रामुख्याने राज्याचे नगरविकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे कडे करण्यात आल्या शहरातील सर्व नागरिकांना घरकुल चा प्राप्त निधी वितरित करणे उर्वरित निधी लवकरात लवकर उपलब्ध करावा जनता नगर सार्वजनिक वैष्णवी गार्डन मध्ये छत्रपती शिवाजी यांच्या पुतळ्यावर छत्री, लहान मुलांसाठी खेडने, नवरात्र उत्सव दरम्यान परिसर प्रकाश मय राहावं करिता हायमास्ट, महिलांना व पुरुषांना वॉकिंग ट्रॅक या साठी लागणारा निधी उपलब्ध करून द्यावा करिता सर्व विषय गांभीर्याने घेत संबंधितांना मार्गी लावण्या बाबत निर्देश देण्यात यावे अशी मागणी या बैठकीत रेटन्यात आली