कारंजा (घा):- वर्षानुवर्षे काँग्रेस पक्षाचा प्रचार व प्रसार करणारे मुस्लिम समाजाचे नेते शेख अकबर, शेख युनूस व शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते राजू सोंनबरसे यांनी आर्वी विधानसभेचे आमदार दादाराव केचे व माजी सरपंच शिरीष भांगे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होत भारतीय जनता पक्षामद्ये आमदार दादाराव केचे व माजी सभापती मोरेश्वर भांगे यांच्या उपस्थिती मद्ये प्रवेश केला.
प्रवेशकर्त्यानी यावेळी सांगीतले की आर्वी विधानसभेचे नेतृत्व आमदार दादाराव केचे यांच्या विकासात्मक दृष्टिकोनातून आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील मोठया प्रमाणात विकास साध्य केला आहे. याउलट मागील पाच वर्षापासून कारंजा नगर पंचायत वर काँग्रेस ची सत्ता असताना काँग्रेस च्या पदाधिकारी व नगरसेवकांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात करण्यात आलेल्या घोटाळ्यांना कंटाळून तसेच काँग्रेस च्या नेतृत्वाने कारंजा शहराला विकासापासून कोसो दूर ठेवत, मतदानाच्या वेळी भूलथापा देवून गावाची दिशाभूल करत मतपेट्या पुरताच विचार केला त्यामुळे गावाचा सर्वांगीण विकास साध्य करण्याकरिता आपण आज भाजपा मद्ये प्रवेश करीत असल्याचे सांगीतले.. शेख अकबर व शेख युनूस यांच्या प्रवेशाने नगर पंचायत निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजामध्ये मोठा उलटफेर पहावयास मिळण्याची शक्यता आहे.
प्रवेश करतेवेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शिरीष भांगे, तालुका अध्यक्ष मुकुंदा बारंगे, शहर अध्यक्ष दिलीप जसुतकर, कारंजा तालुका मुस्लिम समाजाचे अध्यक्ष शेख मेहबूब, माजी नगरसेवक शेख निसार, संजय कदम, राजू काळपांडे, अजय कावडकर, राजू वंजारी, बाबा मांनमोडे, अनिल वंजारी, सुदीप भांगे,राजू डोंगरे, सुधाकर दुर्गे किशोर भांगे, अरुण चाफले, युवा मोर्चा चे मंगेश सिडाम, वेदांत घिमे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..