गोतस्करयांच्या दादागिरीला वचक बसविण्यासाठी बजरंग दल ची तक्रार

0
263

 

शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे

आज दिनांक 12 मार्च रोजी विश्व हिंदू परिषद बजरंग दल तालुका व शहर यांच्या वतीने माननीय ठाणेदार साहेब यांना लेखी तक्रार देण्यात आली.
शेगाव शहरात मागील काही महिन्यांपासून गोवंश यांची निर्दयतेने वाहतूक होत असून त्यांची कत्तल होत आहे शहरात प्रवेश करणार्‍या मार्गाद्वारे खामगाव ,वरवट खंडेराव व इतर मार्गे गोवंशाची वाहतूक होऊन ते कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात नेले जात आहे वाहतूक करणार्‍यांकडे त्यासंबंधी कुठलाच परवाना व त्याची विक्री व खरेदी याची कुठलीच नोंद उपलब्ध नसते असे आपल्या मागील काही प्रकरणातून निदर्शनास आले आहे गोमाता ही हिंदू समाजासाठी पूजनीय असून त्याची याप्रकारे होत असलेली विटंबना ही निंदनीय आहे महाराष्ट्रात गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा असूनही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. ही बाब अतिशय गंभीर असून आपण याकडे लक्ष द्यावे त्याचप्रमाणे वाहतूक करणारे वाहन कडे गोवंश वाहतुकीचा कुठलाच परवाना नसतो, त्यावर आळा घालण्यात यावा. काल परवाच घटनेमध्ये अशाच एका वाहनांमध्ये गोवंश कोंबून नेताना विहिंप पदाधिकारी यांनी त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या अंगावर सुद्धा गाडी नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांच्या अशा वाढत्या दादागिरीमुळे भविष्यात एखादी अप्रिय घटना घडू शकते. याचीही प्रशासनास माहिती असावी या सर्व घटनांवर आळा बसावा व या गोवंशाची वाहतूक करणारे व त्याच कत्तलीसाठी नेणारे यांना कारवाई करून कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रत्येक जिल्हा ठिकाणी शहर व तालुका ठिकाणी दामिनी पथक धरतीवर गो-स्कॉड निर्मिती करण्यात यावी. आम्हा गोरक्षकांना न्याय द्यावा अशी मागणी आम्ही याद्वारे आपणास करीत आहोत. शहरात मागील काही दिवसांपासून चोरीचे सुद्धा प्रमाण वाढले आहे व त्यांना अभय देणारे यांच्यावर सुद्धा कारवाई करून त्यांना खाकी हिसका दाखवावा , अशी तक्रार दाखल करण्यात आली यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री योगेश जी भारद्वाज, विहिंप तालुकाध्यक्ष विजय राठी, शहर अध्यक्ष प्रवीण मोरखडे, बजरंग दल तालुका संयोजक सोमेश कांबळे शहर संयोजक शुभम ढगे ,शहर उपाध्यक्ष मनीष नारणोलीया,जिल्हा सह गोरक्षा प्रमुख सचिन हिवरे, नगर गोरक्षा प्रमुख हरिओम तिव्हाने, पवन बघे, अमोल शेगोकार ऋषिकेश हिंगणे, आकाश पाटील, शुभम अजाडीवाल ,शुभम देशमुख, विशाल ठेंग, सागर गलवाडे, सुरज थोरात, गणेश सोळंके, विशाल भिसे ,कृष्णा तिवारी, सौरभ स्वामी ,योगेश कडू, योगेश ठाकरे , गोपाल लखाडे,आदित्य शशांक शेंडे, ऋग्वेद चत्तेरकार चंद्रकांत माने, राज वाधवानी, गजानन परियाल, सौरभ पहुरकर, आशिष सावळे, आशिष ददगाळ, विठ्ठल पाटील, विशाल वाघ, श्रीकांत टोंगळे, गौरव लांजुडकर आदी बजरंग दल कार्यकर्ते उपस्थित होते.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here