सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )
प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार बुलढाणा जिल्हयात दिनांक ३० व ३१ मार्चला तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची अधिक शक्यता आहे. त्यासाठी नागरिकांनी उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घ्यावी. शेतकरी बंधूंंनी उष्माघातापासून बचाव म्हणून शेतातील कामे शक्यतो सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेत करावी. जनावरांना सावलीमध्ये किंवा गोठ्यामध्ये बांधून ठेवावे, त्यांना पिण्यासाठी स्वच्छ, थंड पाण्याची व्यवस्था करावी !व लोकांनी सुद्धा विनाकारण घराच्या बाहेर पडू नये ‘शिवाय लहान मुलांना घेऊन मोटरसायकलने सुद्धा प्रवास करू नये डोक्याला रुमाल किंवा टोपी घालावी .
असे आव्हानही बुलढाणा जिल्हा कृषी हवामान केंद्राचे कृषी हवामान निरीक्षक अनिल जाधव यांनी केले आहे !
अगोदरच अवकाळी पाऊस व कोरोना चे संकटआणि त्यामध्ये आणखी उष्णतेचे लाट ‘त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी ‘या शिवाय पर्याय नाही ‘