सचिन वाघे वर्धा
17.6.21
हिंगणघाट ते जाम वरील सर्विस रोड उब्दा या गावापर्यंत वाढ करण्यातयावी
या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण खूप जास्त वाढलेले आहे.
सात किलोमीटरचे रस्ते दरम्यान आठ ते दहा खेडेगाव आहे
आजंती, एमआयडीसी ते उब्दा पर्यंत जवळपास पन्नास उद्योगधंदे कारखाने आहे तसेच जामची सूतगिरणी सुद्धा आहे .
सर्व मजूर वर्ग भोवतालच्या भागातील असून ऑटो, दुचाकीवर ,काही पायदळ सुद्धा नेहमी येणे-जाणे करते
बहुतांश शेत जमिनी ह्या ज्या पलिकडच्या भागात असून शेती विषयक सर्व कामाकरिता नेहमी जाणे-येणे असते
संपूर्ण भागातील लोकांना हिंगणघाट मध्ये प्रत्येक महत्त्वाच्या कामाकरता शिक्षण आरोग्य, प्रशासन व इतर कामांकरिता दिवस-रात्र जाणे येणे करावे लागते .मध्यंतरी झालेले अपघात स्थानिक लोकांचे असून विदारक होते की ते सांगणे खूप अवघड आहे . आमदार समीर कुणावर मार्फत युवा मोर्चा व समस्त कामगार ,शेतकरी, विद्यार्थी वाहतूकदार, उद्योजकांकडून श्री अंकुश ठाकूर नगरसेवक, प्रदेश सचिव भाजयुमो यांनी निवेदन दिले