नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-
देश रक्षनार्थ आपले प्राण ओतणारे, भारत भू साठी धारातीर्थी पडणारे देशाचे सैनिक ऊन पाऊस वारा जात धर्म पंत भाषा कशाचीही चिंता न करता फक्त देशाचे रक्षण करून आपल्याला सुख समाधान आणि शांतिपुर्वक जीवन जगण्याची मुभा देणाऱ्या देशाच्या सैनीकाला जर आपल्या देशात आपल्या गावात समस्येला सामोरे जावे लागत असेल तर ही किती दूर्भाग्यपूर्न घटना आहे. आणि त्यासाठी त्याला आंदोलन करण्याची वेळ येऊ देणे याला काय म्हणावे?
नांदूरा वार्ड क्रमांक 1 मधील सांडपाणी हे नगरपरिषद ने ओपन स्पेस मध्ये लोकांच्या घराकडे सोडलेले आहे. हे पाणी नाली तोडून.माजी सैनिक रतन डोंगरदिवे व आय बी सेवन चे तालुका प्रतिनिधी असून सुद्धा यांना येण्या-जाण्यासाठी संडासचे व घाणीचे साम्राज्य सोबत संघर्ष करावा लागतो.
त्यामुळे त्यांच्या व येथील रहिवासी उल्हास हाताडकर, अर्जून साबे, विजय चांभारे, गजानन डांगे, देवा डंबेलकर या सर्वांना घाणीचे साम्राज्य सोबत लढा द्यावा लागतो घाणीच्या पाण्यामुळे डास जास्त निर्माण होत आहेत. त्या डासामुळे डेंगू मलेरिया यासारख्या रोग होण्याची जास्त शक्यता आहे, तरीही नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नगर परीक्षेचे कर्मचाऱ्यांनी यांच्याकडे लक्ष द्यावे त्या कामाची विल्हेवाट न लावल्यास 15 दिवसाच्या आत काम न केल्यास नांदुरा नगर परिषद ला उपोषणाचा इशारा केला आहे असे लेखी निवेदन सुद्धा १६/७ /२०२० ला. दिला आहे.