लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करा व कनेक्शन कापणे थांबवा..अन्यथा मुख्यमंत्री व ऊर्जा मत्र्यांच्या घराचे विज कनेक्शन कापणार -राणा चंदन ..
लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करावे व सक्तीची विजबिल वसूली थांबवून कनेक्शन कापणे तात्काळ थांबवावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राणा चंदन यांच्या नेतृत्वाखाली मलकापूर – सोलापूर महामार्गावर मोताळा ता.जि.बुलडाणा) येथे रास्तारोको करण्यात आला. जर सरकारने लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ केले नाही तर आम्ही ऊर्जा मंत्री व मुख्यमंत्री यांच्या घरांचे वीज कनेक्शन कापू ,असा इशारा राणा चंदन यावेळी दिला.. सकाळ पासून चाललेल्या रास्तारोको मुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच – लांब रांगा लागल्याने महामार्गावर अडीच तास वाहतूक खोळंबली होती…यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ही तैनात होता..
या आंदोलनात,राणा चंदन,शेख रफिक शेख करीम,सय्यद वसीम,महेंद्र जाधव,राजेश गवई ,दत्ता पाटील,मारोती मेढे चंदू गवळी,मनोहर उमाडे,वैभव शिरसाट,संतोष गवळी,राजू पन्हाळकर,निलेश पुरभे,गजानन तायडे,राजू गायकवाड,संतोष खराटे,राजु सुरडकर,कबीर खान नारायण तायडे,गजानन गवळी उपस्थित होते..